नमस्कार मित्रांनो,
शुक्रवारचा दिवस हा शुक्र ग्रहाचा दिवस मानला जातो. हा ग्रह ऐश आरामाचा , लक्झरीचा ग्रह मानला जातो. लोकांना त्यांच्या जीवनात सुख-समृद्धीच्या गोष्टींची गरज असते, आणि ती त्यांना तेव्हाच मिळते जेव्हा त्यांच्यावर शुक्राची कृपा बरसते.
जर एखाद्या व्यक्तीचा शुक्र ग्रह बलवान असेल तर अशी व्यक्ती जे काही काम करते, विशेषत: धनाच्या सर्व कामांमध्ये त्यांना निश्चितच लाभ होतो. जीवनातील आकर्षण शुक्र शुभ असल्याने दुप्पट वेगाने वाढते, जे सर्व लोकांना आकर्षित करते.
आम्ही तुम्हाला हेही सांगतो की ज्या लोकांच्या आयुष्यात प्रेमाची कमतरता असते, त्यांना कोणीही पसंत करत नाही, तर त्यांचा शुक्र ग्रह खराब असतो. म्हणूनच शुक्र ग्रह बलवान असणे खूप महत्वाचे आहे जेणेकरून प्रत्येकजण तुम्हाला पसंद करेल आणि जीवनातील पैशाच्या सर्व समस्या दूर होतील.
आजच्या लेखात आम्ही तुम्हाला अशा उपाया बद्दल सांगणार आहोत, जो उपाय केल्याने शुक्र ग्रह बलवान होतो आणि जीवनातील सर्व चैनीच्या गोष्टी आकर्षित होतात. मित्रानो तुम्ही असे लोक खूप वेळा पाहिले असतील की ते खूप कमी काम करतात, पण तरीही त्यांच्याकडे कशाचीही कमतरता नसते.
त्यांना जी गोष्ट हवी असते ती मिळते. त्यांच्या जीवनात प्रेमाची कमतरता नसते आणि विशेषत: असे दिसून येते की ज्या व्यक्तीचा शुक्र ग्रह बलवान असतो, तो माणूस फसवणूक करणारा देखील बनतो. कारण शुक्राचार्य हे असुरांचे गुरू होते, म्हणूनच ज्या व्यक्तीचा शुक्र बलवान असेल, अशा व्यक्तीच्या जीवनात धन, सुख-समृद्धीची कमतरता नसते.
उपाय करताना तुम्हाला शुक्रवारी वेलची जाळून या वेलचीचा तिलक करायचा आहे. म्हणजे वेलची जाळल्यानंतर जो भस्म तयार होईल त्यात थोडे तूप मिसळून, शुक्रवारपासून रोज रात्री या वेलचीची भस्म कपाळाच्या मध्यभागी लावायची आहे आणि मग झोपायचे आहे.
म्हणजे झोपायच्या आधी दररोज रात्री तुम्हाला या प्रयोग करायचा आहे. तुम्ही हा प्रयोग सुरू केल्यावर तुम्हाला ती स्वप्ने दिसतील जी पैशाशी संबंधित आहेत. किंवा पैशांशी संबंधित तुमच्या आयुष्यात ज्या काही समस्या येत आहेत, त्याही दूर होताना दिसतील.
जेव्हा तुम्हाला स्वप्नात दिसू लागते की तुमचे संकट नाहीसे होत आहेत, पैशाची समस्या दूर होत आहे. अशा गोष्टी दिसत असतील तरच तुम्हाला समजेल की हा प्रयोग तुमच्यासाठी कार्य करत आहे. हा प्रयोग तुम्हाला रोज करायचा आहे हे लक्षात ठेवा, मध्येच थांबू नका.
दुसरी गोष्ट म्हणजे शुक्र ग्रहाचा प्रभाव जास्त असतो. त्यामुळे तुम्हाला पाण्याची एक बाटली घ्यावी लागेल आणि त्या पाण्याच्या बाटली कडे पाहत तुम्हाला श्रीं बीज मंत्राचा जप करावा लागेल.
श्रीं बीज मंत्र हा माता लक्ष्मीचा बीज मंत्र आहे. या मंत्राचा विशेष प्रभाव फक्त शुक्रवारी असतो, त्यामुळे पाण्यात पाहताना किमान अर्धा तास श्रीं बीज मंत्राचा जप करावा आणि नंतर हे पाणी घ्यावे.
तुम्ही हे लक्षात ठेवा की आठवड्यातून एकदाच तुम्हाला अर्धा तास श्रीं बीज मंत्राचा जप करावा लागेल. दररोज करण्याची गरज नाही, त्यामुळे फक्त या गोष्टी केल्याने पैशाची समस्या दूर होईल असे दिसेल.
जेव्हा तुम्ही पैशाचे काम करायला जाल. पैशाशी संबंधित कामे असतील किंवा तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी बसला असाल तरीही हा प्रयोग करता येतो. तुम्ही हा प्रयोग कराल, तुम्हाला स्वतःला दिसून येईल की आयुष्य आनंदाने भरून गेलेलं आहे.
एक छोटासा प्रयोग करून तुम्ही पाहू शकता की हा बीज मंत्र किती प्रभावीपणे कार्य करतो. जेव्हा तुम्ही अस्वस्थ, काळजीत, चिंताग्रस्त असाल, किंवा रिकामे बसलेले असाल, तुम्ही जिथे असाल तिथे या मौल्यवान मंत्राचा जप सुरू करा.
ही गोष्ट लक्षात ठेवा की मनात काहीही जप करायचे नाही, फक्त बोलून जप करावा लागतो. तरच त्याचा दुहेरी फायदा होतो. तर अशा प्रकारे तुम्ही शुक्रवारी हे करू शकता आणि माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळवू शकता.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.