नमस्कार मित्रानो, श्री स्वामी समर्थ.
आज आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांचा आवडणाऱ्या ५ गोष्टी ह्या केल्या मुळे स्वामी आपल्या प्रत्यक्ष भेट देतात.
तर मित्रानो आपले स्वामी महाराज्यांना ह्या ५ गोष्टी अगदी मनापासुन आवडतात अणि जो भक्त ह्या गोष्टी पाळतो. अश्या व्यकीला स्वामी लवकरच भेट देतात आणि त्याची सगळी समस्या दूर करतात, त्यांच्या सगळ्या इच्छा देखील पूर्ण करतात.
मित्रानो तुम्ही सुद्धा ह्या ५ गोष्टी पाळा आणि स्वामींची भेट आपल्याला लवकर होईल आपल्या सगळ्या इच्छा देखील पूर्ण होतील. चला तर मग जाणून घेऊ त्या ५ गोष्टी कोणत्या आहेत.
मित्रानो सगळ्यात प्रथम आणि महत्वाची गोष्ट आहे स्वामींची सगुण उपासना मना पासून मनो भावे आणि पूर्ण श्रध्देने स्वामींची उपासना करणे स्वामीना अतिशय प्रिय आहे.
अश्याच सगुण उपासनेला आणि सेवेला स्वामी प्रसन्न होऊन भक्तांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात. तुम्ही सुद्धा स्वामींची मनापासुन उपासना करा स्वामींची सेवा करा, नक्कीच तुम्हाला ते दर्शन देतील.
मित्रानो दुसरी गोष्ट आहे अन्नदान हे सगळ्यात पुण्याचे काम आहे लोक अन्न दान करतात. परंतु ते कोणत्या तरी खास दिवशी सना सुदी ला करतात जेणे करून तेचे फळं आपल्या मिळेल असे वाटे परंतु हे अत्यंत चुकीचे आहे.
अन्नदान गरीब व्यक्तीला रोज करायला पाहिजे निदान एक भाकरी एक चपाती किंवा जे काही असेल. आपण ते द्यावे किंवा मागणारा कोणी गरीब आला तर अन्नदान करा कारण अन्नदान करणे हे स्वामीना अतिशय प्रिय आहे.
मित्रानो तिसरी गोष्ट आहे नामस्मरण, तुम्हाला माहित असेल की श्री स्वामी समर्थ नामा मध्ये किती शक्ती आहे ह्या नावाचे मनोभावे नामस्मरण केले.
<
तर स्वामी प्रसन्न होऊन आपल्या भक्तांची संकट दूर करतात आणि भक्तांच्या सगळ्या इच्छा देखील पूर्ण करतात. म्हणून स्वामींचे नामस्मरण कधीही सोडू नये.
मित्रानो चौथी गोष्ट आहे माणूस जोडण्याची हौस माणूस जोडण्याची हौस म्हणजे जनप्रियता प्रत्येक माणसा सोबत प्रेमाने बोलणे, मोठ्यांचा आदर करणे सर्वांना समान प्रेम करणे कोणाचाही तिरस्कार न कारणे ह्या गोष्टी जो पण पाळतो. स्वामी त्याच्या वर प्रसन्न होतात.
मित्रानो शेवटची आणि पाचवी गोष्ट आहे परिस्थिती, आपली जी काही परीस्थिती असेल ती हसून समाधानी असायला पाहिजे म्हणजे आपल्याला जे काही मिळाले आहे त्यात आनंदी जीवन जगायला पाहिजे.
जास्त मिळेल ह्याची आशा ठेवायची नाही जे आहे मध्ये रडायचं नाही जे दिले आहे ते देवाने दिले आहे आणि ह्या मध्येच आनंदी राहून आपण आपले जीवन जगायचे आहे.
तर मित्रानो ह्या त्या पाच गोष्टी आहेत ज्या आपल्याला कायम लक्षात ठेवायचे आहेत अणि रोजच्या जीवनात आचरणात आणण्याचा आहे ह्या गोष्टी आपल्या आचरणात आल्या की स्वामी आपल्या वर नक्कीच प्रसन्न होतील अणि आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील श्री स्वामी समर्थ.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.