नमस्कार मित्रांनो,
स्वामी प्रिय भक्त हो आज आम्ही तुम्हाला एका स्वामी सेवेकरी दादांना आलेला स्वामींचा अनुभव तुम्हाला सांगणार आहे.
ते सांगतात,’ आम्ही फार पूर्वीपासून श्री स्वामी समर्थ यांचे सेवेकरी आहोत. आज मी तुमच्यासमोर माझ्या आईच्या दुखण्याचा अनुभव तुम्हाला सांगणार आहे.
सुरूवातीला आईच्या पायाला मुंग्या येत होत्या. हळूहळू संपूर्ण पायात आणि कमरेमध्ये वेदना व्हायला लागल्या. डॉक्टरांनी प्रयत्न केले पण वेदना वाढत होत्या. एक्स-रे आणि स्कॅन केले असता लक्षात आले की तिचा चौथा आणि पाचवा मणका झिजला आहे.
डॉक्टरांनी सांगितले की तिचे ऑपरेशन करावे लागेल. आमच्यासाठी हा खूप मोठा निर्णय होता. तेव्हा आम्ही अगोदर दिंडोरी गाठणे महत्त्वाचे समजले. तिथे आम्हाला काही सेवा दिल्या आणि ऑपरेशनची काहीच गरज नाही असे सांगितले.
त्याप्रमाणे आम्ही डॉक्टरांना ऑपरेशन करायचे नाही असे सांगितले. आम्ही घरीच सेवा सुरू केली. आईला वेदना दिवसेंदिवस असह्य होत होत्या. ती थोडे देखील चालू शकत नव्हती. तिच्याकडून थोडीदेखील हालचाल होत नव्हती. आईला नाईलाजाने दवाखान्यात भरती करावे लागले.
डॉक्टरांनी रक्ताची तपासणी केली आणि त्यानंतर ते म्हणाले की तिला मणक्यामध्ये टीबी झालेला आहे. तुम्ही ऑपरेशनला नाही म्हटले हेच खूप चांगले झाले. डॉक्टरांनी काही औषधे लिहून दिली आणि तिला घरी सोडले.
आम्ही जेव्हा आईला घरी घेऊन आलो तेव्हा ती कोणतीच हालचाल करू शकत नव्हती. आता आम्हाला आधार होता तो फक्त स्वामी सेवेचा.
गुरुमाऊलींनी दिलेल्या सेवा, नाडीवरील जप, नित्यसेवा, शंकराच्या पिंडीवर अभिषेक व अभिषेक तीर्था बरोबर डॉक्टरांच्या गोळ्या-औषधे असा नित्यक्रम सुरू होता. अशा अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये माझी आई एक वर्ष फक्त पाठीवर झोपून होती.
तिला अन्न पाणीदेखील भरवावे लागे इतकी वाईट परिस्थिती होती. पुढे काय होईल याबद्दल कुणीच काहीच सांगायला तयार नव्हते. मी मात्र स्वामींवर भार टाकून सेवा करत होतो आणि वर्षानंतर परिस्थिती बदलायला सुरुवात झाली.
आईला आता उभे राहता येऊ लागले. पुढील सहा महिने ती हळूहळू हालचाल वाढवत होती आणि दीड वर्षानंतर तिला आधाराने चालता यायला लागले. आज माझी आई ठणठणीत आहे. आई घरातले सगळे काम करते आहे.
आज तिला कोणी पाहिले तर विश्वास ठेवणार नाही की ती दीड-दोन वर्षानंतर या आजारातून उठली आहे. डॉक्टर देखील म्हणाले की वर्षभर कायम अंथरुणात पडून देखील तिला काहीही त्वचेचा आजार, विकार जडलेला नाही.
अशक्य ही शक्य करतील स्वामी. आपल्या महाराजांवर जर आपण भार सोपवला तर ते आपले दुःख कमी करतात आणि आपल्या मनात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
सगळे एकदम चांगले होणार आहे आणि ज्या कष्टातून आपण जात आहोत ते यामुळे फुलासारखे हलके होते आणि स्वामी नंतर देखील सगळे एकदम चांगले करतात.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.’
स्वामी प्रिय भक्त हो हा अनुभव आपल्याला नक्की आवडला असेल. धन्यवाद.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.