अवधूत चिंतनश्री गुरूदेव दत्त.
श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी भक्त हो नमस्कार, अक्कलकोट दरबार म्हणजे स्वामींची कार्यशाळाच होती. चालता-बोलता स्वामी महाराज सहज शिकवण देत. स्वामी तिथल्या सेवेकऱ्यांना अतिशय प्रेमाने वागवत असे समजा. कोणी सेवेकरी चुकलं स्वामी त्याला नमस्कार हो !! नमस्कार असे बोलत तेव्हा प्रत्यक्ष परब्रह्म आपल्याला नमस्कार करतो आहे.
हे बघून त्या सेवेकऱ्यांना मरणप्राय दुःख होत आणि तो कान उपटून स्वामींची माफी मागत. स्वामीभक्तहो अशा पद्धतीने स्वामींच्या लीला सुरु होत्या. समजा काही सेवेकरी पत्ते खेळत आहेत आणि स्वामींनी त्यांना बघितले तर आयुष्य गेले रे गेले. असे स्वामी बोलत व कोणी फुकटच्या बढाई मारू लागला, तर स्वामी त्याला बोलत अरे काय रे. तुला काय करायचे आहे.
तर इतकेच नव्हे जर स्वामी सेवेकरी उंचावर बसला तर स्वामी त्याच्याकडे बघत आणि बोलत अरे.. खाली बैस!! किंवा जर कोणाला ज्ञान हवे असेल तर महाराज शिकून जा!! असे बोलत अशा पद्धतीने स्वामींच्या ह्या मानव घडवण्याच्या कार्य शाळेतून अनेक लोक घडले. अनेक भक्त घडले. यातच एक परशुराम नावाचा सेवेकरी काशी यात्रेसाठी निघाला आणि स्वामींची आज्ञा घेण्यासाठी स्वामींकडे आला.
त्याने स्वामींना कळवली तेव्हा स्वामींनी त्याच्याकडे बघितले आणि बोलले संत चरणांची माती! तीच माझी भागीरथी!! स्वामीभक्तहो स्वामींनी असे बोलताच परशुरामला कळून चुकले की स्वामी आपले गुरु आहेत. स्वामींचे चरणच परम पवित्र तीर्थस्थान आहे. इतरत्र जाण्याची गरज नाही आणि हा स्वामी संकेत त्यांनी ओळखलं. आणि त्याप्रमाणे काशी ला जाण्याचा बेत त्याने रद्द केला.
श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आजची स्वामीवांणी खूपच प्रेरणादायी आहे. स्वामी मुखातून निघालेल्या अनेक अमृत वचनांचा संग्रहच आहे आणि विशेष म्हणजे हे सर्व आजही तुम्हा-आम्हा सर्वांना लागू पडत आहे. आणि हम गया नही जिंदा है, हे स्वामी अभिवचन सतत लक्षात ठेवून जेव्हा आपल्याकडून काही चूक होईल तेव्हा लगेच समजायचे कि स्वामी आपल्याला नमस्कार हो नमस्कार.
असे बोलत आहे. जेव्हा आपले मन जुगार, व्यसन,फेसबुक, व्हाट्सअप व इतर सोशल मीडिया सारखे गोष्टींमध्ये कामाव्यतिरिक्त उगाच टाइमपास करू लागले तर खुशाल समजायचे कि आयुष्य गेले रे गेले असे स्वामी महाराज बोलत आहे. व चार चौघात आपले मन उगीच बढाई का मारू लागले, तर काय रे तुला काय करायचे आहे म्हणजेच फुकटच्या बढाई मारू नकोस. आपल्या कामावर लक्ष दे. असे स्वामी बोलत आहे.
स्वामीभक्तहो यासह आपल्याला ज्ञान हवे असेल मग ते शालेय पासून उच्च आध्यात्मिक आत्म ज्ञानापर्यंत असेल तर अशा वेळेला स्वामी आपल्याला शिकून जा असे सांगत आहेत. असे खुशाल समजावे आणि ग्रहण शील होऊन स्वामी लीला विविध ग्रंथ सकारात्मक पुस्तके आपल्या जीवनातील विविध घटना व विविध लोकांच्या द्वारे मिळणारे संकेत लक्षात घेत स्वामी आपल्याला ज्ञान प्रदान करत आहेत.
हा विश्वास ठेवून आपले कर्म करायचे आहे आणि यशस्वी जीवनाची अभिव्यक्ती करायची आहे. यासह पुढे जर आपले मन यशाने उन्मत्त झाले इतरांना तुच्छ आणि स्वतःला श्रेष्ठ समजू लागले, तेव्हा अरे खाली बैस ही निश्चितच स्वामिवांणी निश्चितच आपल्याला ऐकू येईल. तेव्हा खुशाल समजायचे कि स्वामींनी आपल्याला नम्र अहंकाररहीत होण्याची आज्ञा दिली आहे.
<
आणि खरा कर्ता कोण आहे याचे मनन चिंतन करण्याचा हुकूम स्वामींनी दिला आहे. यासह जेव्हा परशुराम जाण्यास निघाला तेव्हा संत चरणांची माती तीच माझी भागीरथी हा उपदेश देऊन स्वामी त्याला स्वतः कृपेचा स्त्रोत आहे. सकारात्मकतेचा स्त्रोत आहे. मी स्वतः येथे असताना इतरत्र जाण्याची गरज नाही. असे सांगून गुरु साक्षात परब्रम्ह हे कृतिशील साधना सांगितली.
आणि हाच तुम्हा आम्हा सर्वांसाठी आजच्या पिढीसाठी सुद्धा संकेत समजून आपण ज्या उद्देशाने तीर्थक्षेत्री सकारात्मक ऊर्जा ग्रहण करण्यासाठी जातो. तोच उद्देश समोर ठेवून जर आपल्या सभोवताली संतमंडळी असतील. व आपले कोणी मित्र नातेवाईक असतील. की जे सकारात्मक आहेत, ज्यांच्या सान्निध्यात गेल्यानंतर आपल्याला छान वाटते. आपल्याला प्रेरणा मिळते. तर अशा लोकांच्या सान्निध्यात राहणे सुद्धा तीर्थक्षेत्र समान आहे.
किंबहुना हे तीर्थक्षेत्र आहे असे समजावे. थोडक्यात आजही स्वामी त्यांच्या लीलांमधून आपल्याला सकारात्मक आनंदी जीवन जगण्याची समज देत आहेत. म्हणून स्वामीभक्त हो आपल्यासाठी ही स्वामी वाणी म्हणजे खजिनाच आहे. या खजिनाचा अर्थ समजून घेण्यासाठी ग्रहणशील व्हायचे आहे. आणि पूर्णपणे ग्रहनशील होऊन ही कृपा प्राशन करायची आहे. आणि स्वामींना अपेक्षित आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करायची आहे.
हा बोध घेऊन आजआपण स्वामींना प्रार्थना करूया हे स्वामी राया!! तुम्ही अक्कलकोट नगरीत सगुण रूपात आलात. अनेक लीला केल्या. ह्या लीला आजही आम्हाला अनेक गोष्टी शिकवत आहेत. हे आई!! तुमच्या मुखातून निघालेल्या एक एक शब्द म्हणजे अमृताप्रमाणे आहे. जो प्राशन करेल त्याचे कल्याणच होईल. हे गुरुराया!! आम्ही अल्प बुद्धी आहोत. आम्हाला सज्ञानी करा. तुमच्या स्वामी म्हणीचा अर्थ समजण्याचा विवेक जागृत करा. तो आचरणात आणण्याची शक्ती द्या. आणि तुम्हाला अपेक्षित यशस्वी मी आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करून घ्या!! कारण तुम्ही सोडून आम्हाला दुसरे कोणीच नाही!!
अनंत कोटी ब्रह्मांडनायक, राजाधिराज योगीराज परब्रम्ह
श्री सचिदानंद सद्गुरू अवधुतचिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय धन्यवाद
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.