स्वामी कशाप्रकारे आपल्या जीवनात चमत्कार करतात नक्की पहा.

नमस्कार मित्रांनो,

मोगल प्रांतीत जोगाईच्या आंब्यानजीक केज म्हणून गाव आहे. त्या गावात श्री महारूद्रराव देशपांडे नावाचे ऋग्वेदी ब्रा ह्म ण राहात. हे खूप श्रीमंत होते परंतु त्यांचे उत्पन्न निजाम सरकारने जप्त केले होते. उ त्प न्न सुटण्यासाठी त्यांनी भरपूर प्र य त्न केले पण सर्व प्र य त्न निष्फळ ठरले. त्याच वेळेला बीडमध्ये कोणी एक साधू आलेला आहे असे त्यांना समजले आणि ते त्या साधूच्या दर्शनासाठी गेले. साधूचे द र्श न घेऊन त्यांनी घडलेली सर्व हकीकत त्यांना सांगितली.

त्यांची सर्व व्यवस्था ऐकल्यानंतर साधू त्यांना बोले की, तुम्ही अक्कलकोट येथे जा. तेथे परमहंस स्वामी आहेत. त्यांच्याकडे गेल्यानंतर तुमचे कार्य होईल असे वाटते, त्या साधूने असा वि श्वा स दिल्यानंतर श्री देशपांडे यांना आशेचा किरण दिसू लागला. आणि ते ता त्का ळ अक्कलकोट पुण्यपावन नगरीत आले. स्वामींच्या वास्तव्यने पुण्य झालेल्या अक्कलकोट नगरीत येताच देशपांडे यांना खूप बरे वाटले. स्वामींसाठी श्रीफळ आधी पूजा सामग्री घेऊन स्वामींच्या दरबारात ते येतात.

स्वामींचे चरणांवर न त म स्त क होऊन हात जोडून उभे राहतात. इतक्या स्वामी त्यांच्याकडे बघतात आणि बोलतात चार मनोरे आहेत तेथे जा म्हणजे तुमचे शेत सोडून देऊ. खर तर श्री देशपांडे यांनी आपली व्यथा कोणालाच सांगितली नव्हती. स्वामींचे अंतसाक्षीत्वाचे बोलणे ऐकून श्री देशपांडे हे भारावूनच गेले. त्यांना आ श्च र्य वाटले आणि स्वामींची आज्ञा घेऊन ते लगेच हैद्राबाद येथे आले. स्वामी भक्तहो स्वामीवाणी होती ती.

ज्या दिवशी श्री देशपांडे हैदराबाद येथे आले त्याच दिवशी सरकारातून हुकूम आला आणि श्री देशपांडे यांचे जप्त झालेले उ त्प न्न सोडून दिले. ही बातमी ऐकताच श्री महारूद्र देशपांडे हे आनंदाने नाचूच लागले म्हणा. त्यानंतर ते पुन्हा अक्कलकोटला आले. स्वामींचा आलेला अनुभव त्यांनी अतिशय प्रेमाने सर्वांना सांगितला. सर्वांना आ श्च र्य वाटले त्यानंतर महारुद्रराव देशपांडे यांना अनेक अनुभव येत गेले. ते एकदा पंढरपूरास गेले असता पांडुरंगाचे द र्श न घेत असताना विठ्ठलाच्या ठिकाणी स्वामींचे द र्श न झाले.

जसे जसे त्यांना अनुभव येत होते तशी तशी त्यांची स्वामी भक्ती दृ ढ होत होती. पुढे ते पंढरपूरवरून अक्कलकोट येथे आले. तेथे त्यांनी स्वामी हुकुमाप्रमाणे हजार लोकांचे अ न्न दा न केले. त्यानंतर जेव्हा ते घरी आले तेव्हा त्यांना पुरलेले द्रव्याचे हांडे सापडले. थोडक्यात त्यांचा उत्तर उत्तर विकासच होत होता. स्वामी भक्तहो या जीवनाच्या सागरात सुख दुःखाच्या लाटांची भरतीओटी सुरूच असते. आणि महारुद्रराव देशपांडे यांच्या बाबतीत सुद्धा असेच घडले.

त्यांना अचानक वायुप्रकोप होऊन तापाने त्यांची प्रकृती बिघडली. त्यांची तब्येत इतकी खराब झाली की, सर्वांनी त्यांच्या जगण्याची आशाच सोडून दिली. आता त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव रघुउत्तमराव घाबरले आणि तळमळीने प्रार्थना करत अक्कलकोट येथे आले. अक्कलकोट येथे आल्यानंतर स्वामींच्या समोर हात जोडून उभे राहिले आणि प्रार्थना करत बोलू लागले स्वामी आमचे वडील भयंकर तापाने अत्यवस्थ आहे. त्यांच्याशिवाय आमच्या प्रपंचाला काहीच अर्थ नाही. तरी कृपा करून त्यांना वाचवा स्वामी कृपा करून त्यांना वाचवा.

स्वामी भक्तहो स्वामी आई आहे. स्वामींचे आपल्या बाळांवर खूप प्रेम आहे. स्वामींनी रघुउत्तमरावांकडे बघितले आणि बोले अरे काळजी नको करू घरी जाऊन स्वस्थ रहा. तुझ्या पित्याला नक्कीच आराम पडेल. स्वामींची ही अभयवांनी ऐकल्यानंतर रघुउत्तमरावांना खूप बरे वाटले. त्यांना खूप आधार आला आणि स्वामी चरणाचे तीर्थ घेऊन ते घरी आले. घरी आल्यानंतर अतिशय श्रद्धेने त्यांनी स्वामी चरणाचे तीर्थ आपल्या पित्याला पाजले. त्यानंतर आ श्च र्य घडू लागले. महारुद्ररावांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली.

चमत्कार असा की, आठ दिवसात महारुद्रराव ठणठणीत बरे झाले. स्वामींचा हा च म त्का र बघता सर्वांना आ श्च र्य वाटले आणि सर्वांनी एक घोषात स्वामी नामाचा जयजयकार केला. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी. आजच्या स्वामीवाणीतून स्वामी महाराज आपल्याला असंख्य बोध देत आहेत. पैकी स्वामी सेवा करत असताना जीवनात कितीही सुख दुःखाचे पडाव येऊ देत स्वामी आपल्या सदैव पाठीशी असतात. हा बोध दृढ होतो आहे. बघा जसे महारुद्रराव देशपांडे यांच्या बाबतीत घडले.

अगदी तसेच आपल्या बाबतीत सुद्धा होत असते जेव्हा आपण स्वामी सेवेत येतो तेव्हा आपल्याला असंख्य अनुभव येण्यास सुरुवात होते. जीवनात च म त्का र सुद्धा व्हायला सुरुवात होते. परंतु जेव्हा अचानक एखादे संकट येते तेव्हा आपले मन खचून जाते. हा संकटांचा काळच आपल्या अनन्य भक्तीच्या परीक्षेचा काळ असतो आणि या काळातच आपला खरा विकास होत असतो. बघा महारुद्रराव यांचे चिरंजीव स्वामींकडे आले. म्हणजे त्यांना हा विश्वास होता की, मरणाच्या दारातून आपल्या पित्याला फक्त स्वामीच तारून नेऊ शकतात आणि पुढे त्यांना त्यांच्या अतूट श्रद्धेचा अनुभव आला.

स्वामींनी त्यांना अभय वचन दिले काळजी नको करू स्वस्त रहा. आणि महारुद्रराव 8 दिवसातच बरे झाले. म्हणून आज आपल्याला आजच्या पिढीसाठी या लिलेतून बोध घेता ही समज दृढ करायची आहे की, आता आपण स्वामी चरण पकडले आहे ना. तर या स्वामीवाणी सांगितल्याप्रमाणे आज आपल्या जीवनात कितीही मोठे संकट असू द्या काळजी नको करू स्व स्थ रहा.
आजच्या या स्वामीवाणीतून नित्य स्मरण करत राहायचे आहे.

प्र त्ये क श्वासाला आपले सर्व चित्त स्वामी चरणांवर स्थिर करून आपले संकट दूर होणारच या दृढ विश्वासाने आपले प्रामाणिक प्र य त्न करत राहायचे आहे.बघा जसे मरणाच्या दारात असलेल्या महारुद्रराव यांना पुन्हा नवीन जीवन लाभले अगदी त्याप्रमाणे आपल्या जीवनात सुद्धा नक्कीच च म त्का र घडतील. चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करूया. हे परमपित्या काळजी नको करू स्वस्त रहा मी तुझ्या पाठीशी आहे. आज पुन्हा आम्हा बालकांना ह्या अभय वचनाची समज दिली तुम्हाला धन्यवाद.

जेव्हा तुमचे हे अभय वचन कानी पडते तेव्हा शरीर मनात एक ऊर्जेचा संचार होतो आणि पर्वताएवढे वाटणारी संकटे क्षणात चण्या फुटण्याण्यासारखी वाटू लागतात. हे आई हा सर्व तुमच्या नामाचा महिमा आहे. आमचे खरोखरच भाग्य आहे की, आमच्या मुखात नाम आहे. हे दत्तात्रेया आम्हा बालकांचे तुमच्याकडे इतकेच मागणे आहे की, तुमचे नाम असेच आमच्या मुखी ठेवा आणि तुमची सेवा करून घ्या. कारण तुम्ही आमचे गुरू आहात तुम्ही सोडून आम्हाला दुसरे कोणीच नाही आम्हाला प्रेरणा द्या आम्हाला मार्गदर्शन करा.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *