माझ्या वडिलांनी स्वामींच्या समोरचा नैवेद्य खाल्ला आणि… एक भावस्पर्शी अदभूत स्वामी अनुभव…

नमस्कार मित्रांनो.

एक स्वामिसेवेक ताईंच्या शब्दांतला हा अनुभव त्या म्हणतात, मी अपर्णा स्वामी नेहमी माझ्या पाठीशी उभे आहेत. ह्यांचा एक अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे.

मी खूप वर्षांपासून स्वामींच्या सेवेत आहे, स्वामींनी मला काही कधी कमी पडू दिले नाही. स्वामींच्या चारणापाशी मला नेहमी शांतता आणि सुख मिळते.

घरात कितीही ताण असुदे स्वामींच्या नावाचा जप केला की मला अतिशय प्रसन्न वाटायला लागते. स्वामींच्या आशीर्वादाने मला काहीही कधी कमी पडलेली नाही. पण म्हणतात ना आयुष्य हे अनेक गोष्टी घेऊन येत.

आपण ज्या गोष्टींची कल्पना सुद्धा करू शकत नाही अश्या गोष्टी आपल्या आयुष्यात होतात. संकटाशी सामना करणे हेच तर आयुष्य नाही का!आणि कधी संकट येईल इतकी आपल्या कल्पनेच्या बाहेर असतात.

आपण निराशीत होत जातो अश्यावेळी आपण काही करू शकत नाही. या वेळी स्वामी आपल्याला साथ देतात, आपल्या मागे उभे राहतात त्यांचा आवाज सतत कानात येतो.

‘भियू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ आणि मी सर्वे छान व्हाल सुरुवात होते. माझे माझ्या वडिलांवर खूप प्रेम आहे. माझ्या आयुष्यात जर कोणी हिरो असेल तर ते माझे वडील.

पण एकेदिवशी अकस्मत माझ्या वडिलांना हृदयाचा त्रास सुरू झाला. सकाळी आमच्या घरी स्वामींसाठी केलेला नैवेद्य होता. मी आणि आईने स्वामींपुढे वाढलेले ताट वडिलांना दिले.

वडील २०/२५ किलोमीटर असणाऱ्या आपल्या कामाच्या ठिकाणी गेले. वडील नेहमी गाडीवर कामाला जातात. वडील आपल्या कामावरून घरी यायला निघाले. काही अंतरात आले असतील त्यांच्या छातीमध्ये खूप जास्त दुखायला लागले.

तरीदेखील ते १७/१८ किलोमीटर तश्या परिस्थितीत गाडी चालवत घरी आले. घरी आल्यावर त्यांनी जे होताय ते आम्हाला सांगितले. ते अक्षरशः कळवला होते. आम्ही खूप घाबरलो होतो.

आम्ही शेजारच्यांच्या साहायाने वडिलांना ताबडतोब दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी सांगितले वडिलांना अटॅक आला होता. दवाखान्यात नेल्यानंतर त्यांची तब्बेत सुधारायला लागली. दुसऱ्यादिवशी वडील आमच्याशी बोलत होते.

वडील म्हणाले स्वामींचा प्रसाद खाल्यामुळे मी आज जिवंत आहे. नाहीतर ही कल्पनाच करवत नाहीये. अनेक बातम्या अनेक लोकांकडून ऐकले आहे. डॉक्टर देखील म्हणाले या वेळी वेळेवर उपचार व्हायला हवे.

अश्या वेळी आपण शांत बाबसायला हवे. गाडी चालवणे अगदी जीवघेणे असते. पण वडील इतके लांब गाडी चालवत आले. घरी येऊन काय होते ते सांगितले व दवाखान्यात आम्ही गेलो.

यावेळी दुसऱ्या एखाद्याचे वाचणे अगदी अशक्य होते. अशक्यही शक्य करतील स्वामी खरच माझ्या स्वामींच्या प्रसादाने माझ्या वडिलांचे प्राण वाचवले. आपल्या स्वामींच्या अनुभवला खूप छान प्रतिसाद मिळत आहे. ।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।। धन्यवाद.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *