नमस्कार मित्रांनो,
एकदा एक माणूस मरतांनाही खूप यातना भोगत होता. त्याला पाहण्यासाठी खूप लोकं जमली होती. तेव्हा तेथून एक संत जात होते. लोकांनी त्या संतांना विचारलं या पिडीताला मुक्ती मिळण्यासाठी एखादा उपाय सांगा जेणेकरून त्याचा शांततेत मृत्यु होईल. संतांनी सांगितलं…
कथा
एकदा एक माणूस मरतांनाही खूप यातना भोगत होता. त्याला पाहण्यासाठी खूप लोकं जमली होती. तेव्हा तेथून एक संत जात होते. लोकांनी त्या संतांना विचारलं या पिडीताला मुक्ती मिळण्यासाठी एखादा उपाय सांगा जेणेकरून त्याचा शांततेत मृत्यु होईल. संतांनी सांगितलं जर स्वर्गातली माती आणली तर तो या यातनेतून मुक्त होईल. सगळे थक्क झाले आता स्वर्गातून माती कोण आणेल ?
संतांचं ऐकून एक निरागस छोटा मुलगा धावत धावत गेला आणि एक मुठ्ठी भरून माती घेऊन परत आला आणि म्हणाला ही घ्या स्वर्गातली माती. या मातीने यांना टिळा लावा. एका माणसाने त्या मुलाच्या हातातली माती घेतली आणि यातना भोगत असलेल्या त्या माणसाला टिळा लावला. टिळा लावता आणि तो माणूस यातना मुक्त झाला आणि त्याचा मृत्यू झाला. सर्वांनी हे पाहिलं आणि सर्व चकित झाले. त्या संतांनी त्या लहान मुलाला विचारलं बाळा तू ही माती कुठून आणली. पृथ्वीवर कुठे स्वर्ग आहे की काही क्षणातच तू ती माती आणली ?
लहान मुलाने सांगितलं आमच्या शिक्षकांनी सांगितलं होतं आईच्या आशीर्वाद आणि तिच्या पावलांमध्ये जे स्वर्ग आहे ते इतर कुठेही नाही. यामुळे ही माती मी माझी आई उभी असलेल्या जागेवर असलेली माती घेऊन आलो. तेव्हा संत म्हणाले खरं आहे, ज्या मुलांमुळे आईच्या डोळ्यात पाणी येतं त्याला अशा मरण यातना भोगाव्या लागतात. त्यामुळे तुम्ही कितीही यश मिळवा, पैसा जमवा, आकाशाला गवसणी घाला पण आई आनंदी नसेल तर भगवंताला देखील तुम्ही निराश कराल. कुठलंही दान धर्म केल्यानंतरचं मिळणारं फळ तुम्हाला मिळणार नाही.
बोध
वैराग्यावाचून सारा परमार्थ लटका आहे. पक्ष्यांची पिले त्यांच्या पंखाखाली वाढतात, त्याप्रमाणे घरातल्या माणसांना आपण प्रेमाच्या आश्रयात ठेवावे. आपण त्यांच्यावर प्रेम करतो याची जाणीव ज्याला असेल, त्याचे दोष काढलेले त्याला बोचत नाहीत. आईने मुलाचे दोष त्याला सांगितले तरी त्याला त्याचे वाईट वाटत नाही. रोग्याच्या अंगातला ताप निघाला की त्याला शक्तीचे औषध लागू पडते; कारण शक्ति येणे हे स्वाभाविक आहे. त्याचप्रमाणे, अंतःकरण शुद्ध झाले की परमार्थ सोपा बनतो. परमार्थात मनाचे कष्ट आहेत. कारण आपल्याला मनाच्या आजपर्यंतच्या सवयीच्या उलट जायचे आहे; आणि म्हणूनच परमार्थाला अगदी स्वतःपासून सुरुवात करायची असते.
आतमध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवून बाहेरून वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करील, त्याला परमार्थाचा अनुभव लवकर येईल. मन जरा भगवंतापासून बाजूला झाले की इतर विषयाने त्याच्यावर घाला घातलाच म्हणून समजावे. साधकाने रात्रंदिवस अगदी डोळ्यात तेल घालून जप केला पाहिजे. म्हणून परमार्थ म्हणजे अखंड सावधानता होय. प्रपंच आणि परमार्थ वेगळा नाही. प्रपंच अनासक्तिने आणि आनंदाने करणे हाच परमार्थ. परमार्थाच्या आड काय येते ? धन, सुत, दारा, वगैरे आड येत नाहीत, तर त्यांच्यावरचे जे ममत्व ते आड येते.
वस्तूवर आसक्ती न ठेवणे हे वैराग्य आहे; ती वस्तू नसणे हे वैराग्य नव्हे. एखाद्याला बायको नसली म्हणजे तो विरक्त आणि असली तर आसक्त, असे म्हणता येणार नाही. बायको असून लंपट नसेल तो विरक्त. आहे ते परमात्म्यानेच दिले आहे आणि ते त्याचे आहे, असे मानून आनंदाने राहणे हे वैराग्य होय. या भावनेत राहून जो इंद्रियांच्या नादी लागत नाही, तो वैरागी. वैराग्यावाचून सारा परमार्थ लटका आहे. कोणतीही गोष्ट अभ्यासानेच साध्य होत असते.
आज खरी भक्ति नाही म्हणून भगवंताचे स्मरण नाही, आणि भगवंताचे स्मरण ठेवण्याचा अभ्यास केल्याशिवाय खरी भक्ति येत नाही. शहाण्या माणसाने उगीच विकल्प न लढविता, भगवंताचे स्मरण ठेवायला आरंभ करावा. ज्या ठिकाणी आपल्या ओळखीचे कुणी नाही, आपले आप्त कुणी नाहीत, जिथे आपल्याला कुणी मान देत नाही, अशा ठिकाणी राहून अनुसंधानाचा अभ्यास करावा. जिथे कुणी आपल्याला ओळखीचे नाही असे स्थान आपल्या अभ्यासाला चांगले असते.
आपल्या यातना दूर करायच्या असतील, आपल्या मनातली घालमेल दूर करायची असेल आणि समाधानी राहायचं असेल तर मनावर ताबा मिळवण्यासाठी या तारकमंत्राचे पठण करूया.
तारकमंत्राचे पठण
निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना,प्रचंड स्वामीबळ पाठी शी नित्य आहे रे मना आतर्क्य
अवधूत हे स्मरण गामी, अशक्यही शक्य करतील स्वामी.
जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञाविणा
काळही ना नेई त्याला परलोकी ही ना भीती तयाला, अशक्य ही शक्य करतील स्वामी.
उगाची भीतोसी भय हे पळू दे वसे अंतरी ही स्वामी शक्ति कळू दे
जगी जन्म मृत्यू असा खेळ ज्यांचा नको घाबरू असे तू बाळ त्यांचा, अशक्यही शक्य करतील स्वामी.
खरा होई जागा श्रद्धेस हित कसा होशी त्याविण तु स्वामीभक्त आठव कितीदा
दिली त्यांनीच साथ नको डगमगू स्वामी देतील हात अशक्यही शक्य करतील स्वामी.
विभूती नमननाम ध्यानादी तिर्थ स्वामीच या पंचप्राणामृतात हे तिर्थ घेई
आठवी रे प्रचिती न सोडती तयाजया स्वामी घेई हाती अशक्यही शक्य करतील स्वामी.
श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू
सौजन्य – महाराष्ट्र टाइम्स
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.