नमस्कार मित्रांनो,
दर शनिवारी, अमावस्या आणि पौर्णिमेला घराच्या उंबरठ्यावर लावा ही एक वस्तू आणि आपल्या घरातून वाईट शक्ती, निगेटिव्ह एनर्जी नष्ट करा. एक प्रभावी तोडगा आहे.
आपल्या घरात काही ना काही दोष असतात. पिडा असतात किंवा कोणी ना कोणी सतत आजारी असते. घरातील कामे कधीच पूर्ण होत नाहीत. घरातल्या लोकांना यश मिळत नाही. घरात पैसा टिकत नाही, नेहमी कटकटी होत राहतात.
तर या सगळ्या गोष्टींचे कारण आपल्या घरात असते. आपल्या वास्तूमध्ये असते. तर या वास्तू मधूनच आपल्याला नेगेटिव्ह शक्ती, वाईट शक्ती नष्ट करायची आहे आणि त्यासाठीच हा उपाय आहे. जो तुम्हाला फक्त दर शनिवारी, दर अमावस्येला आणि दार पौर्णिमेलाच करायचा आहे.
दर शनिवारी, अमावस्या आणि पौर्णिमेला तुम्हाला घराच्या मुख्य दाराच्या उंबरठ्यावर एक वस्तू लावायची आहे. तर ही वस्तू कोणती आहे ते पाहूया.
तर मित्रांनो ही वस्तू म्हणजे थोडे गोमूत्र घ्यायचे आहे. वाटीमध्ये थोडेसे गोमुत्र घेऊन त्यामध्ये हळद टाकायची. जी आपण पूजेमध्ये हळद वापरतो ते हळद गोमूत्रात टाकून त्याचा एक घोळ तयार करावा. मिश्रण तयार करावे.
या मिश्रणाचा एक पट्टा दरवाजाच्या उंबरठ्यावर लावायचा आहे. म्हणजे दोन-तीन बोटांनी तुम्ही हा पट्टा अगदी सरळ उंबरठ्यावर ओढायचा आहे. संपूर्ण उंबरठ्यावर ओढायचा आहे.
गोमूत्र आणि हळद यांमध्ये एवढी शक्ती असते की आपल्या घरामधील सगळी वाईट शक्ती, सगळी निगेटिव्ह एनर्जी दूर करतात आणि कोणतीही वाईट किंवा नेगेटिव्ह गोष्ट आपल्या घरात प्रवेश करत नाही.
यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाऊन सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. घरात सुख-समृद्धी, शांतता, आनंद, धनसंपदा यांचे आगमन होते.
तर हा उपाय नक्की करून पहा. धन्यवाद.