नमस्कार मित्रांनो,
हिंदू धर्मात नारळाशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही. नारळाला शुभ फळ मानले जाते व प्रत्येक शुभ कार्यात नारळाचा वापर केला जातो. नारळाला लक्ष्मीदेवीचे ही प्रतीक मानतात.
प्रत्येक पूजेत नारळ असणे खूप आवश्यक आहे.
यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते. कोठे तीर्थस्थानाला आपण गेलो की नारळ घेऊन फोडले जाते आणि भगवंताला देऊन आपणही भगवंताचा प्रसाद घेतो. नवरात्रीतही देवीला नारळ दिला जातो.
तसेच गणपती मंदिरात, सर्व शक्तीस्वरूप देवीच्या देवळात नारळ फोडले जाते. पण आपण जर नारळ फोडले आणि ते आतून खराब निघाले तर आपल्याला खूप वाईट वाटते. आपल्या मनात असे येते की देवी-देवता आपल्यावर नाराज झाले आहेत. म्हणून नारळ खराब निघाले व आता आपल्याबरोबर काही अनुचित घटना घडेल.
याच गोष्टीचा आपण विचार करत बसतो. आज आपण नारळ का खराब निघते व याचे कोणते शुभ-अशुभ परिणाम होतात हे आपण पाहूया.
जर तुमचे पूजेचे नारळ खराब निघाले तर याचा अर्थ असा नाही की तुमच्याबरोबर काहीतरी अशुभ होणार आहे किंवा काहीतरी वाईट घटना घडेल. पूजेचा नारळ खराब निघाला याचा अर्थ काहीतरी शुभ घडेल.
पूजेचे नारळ खराब निघणे शुभ असते. असे सांगितले जाते की याद्वारे देव आपल्याला काहीतरी संकेत देत असतात. आज आपण या नारळाच्या संकेता विषयी माहिती घेणार आहोत. जेव्हा आपल्याला या गोष्टीं बद्दल काही माहिती नसते तेव्हा आपण त्याबद्दल काहीतरी भ्रम निर्माण करतो.
अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्या जीवनात खूप मोठा प्रभाव पाडतात. जेव्हा पूजेचे नारळ खराब निघते तेव्हा आपल्याला दुकानदाराचा ही राग येतो व त्याच्याशी आपण भांडायला ही जातो. पण दुकानदार सांगतो की तुम्हाला देव पावला आहे.तेव्हा आपल्याला काहीही लक्षात येत नाही.
यापुढे तुमचे नारळ खराब निघाल्यास तुम्हाला राग येणार नाही तर आनंद होईल. पूजेचे नारळ खराब निघाले तर याचा अर्थ असा की देवाने आपला प्रसाद स्वतः खाल्ला आहे. म्हणूनच नारळ खराब निघते. म्हणजे दुसरे कोणीही ते खाऊ शकणार नाही. ते संपूर्ण नारळ भगवंताला अर्पण करण्यात येते.
त्याचबरोबर याचा दुसरा अर्थ असा आहे की तुमची इच्छा, मनोकामना लवकरच पूर्ण होणार आहे. देवाच्या पूजेच्या वेळी तुमची जी इच्छा असेल ती नक्की पूर्ण होते. असा संकेत आपल्याला याद्वारे मिळतो.
यापुढे जर तुमचे पूजेचे नारळ खराब निघाले तर तुम्ही दुखी होऊ नका उलट आनंद माना की भगवंत आपल्यावर प्रसन्न झाले आहेत आणि त्यावेळी तुम्ही जी इच्छा मनात आणाल ती तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल.
जर आपण नारळ फोडले आणि ते चांगले निघाले तर काय करावे? पूजेत आपण नारळ फोडले आणि त्याचे खोबरे व्यवस्थित निघाले तर तो प्रसाद एकट्याने न ठेवता सर्वांना मंदिरात थोडा थोडा द्यावा. यामुळे आपल्याला पूजेचे संपूर्ण फळ मिळते.
नाहीतर काही व्यक्ती मंदिरात नारळ फोडतात आणि ते नारळ कोणालाही न वाटता तसेच घरी घेऊन जातात. पण यामुळे तो प्रसाद भगवंतापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे पुढच्या वेळी मंदिरात किंवा पूजेला नारळ फोडला की तो सर्वांना प्रसाद म्हणून थोडा थोडा जरूर वाटा.
धन्यवाद.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.