नमस्कार मित्रांनो,
माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये टिकून राहण्यासाठी आपण अनेक उपाय करू शकतो. त्यापैकी एक अत्यंत साधा उपाय आज आपण पाहणार आहोत.
आपल्या घरामध्ये ही एक वस्तू ठेवल्याने आपल्याला श्रीमंत, धनवान होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. कोणीही थांबवू शकणार नाही.
वास्तुशास्त्रामध्ये या उपायाचे खूप मोठे महत्व आहे. असे म्हणतात की या वस्तूंमुळे आपल्या घरामध्ये खूप पैसा प्रचंड प्रमाणात येऊ लागतो. पैसा आपल्याकडे आकर्षित होऊ लागतो.
कोणताही व्यवसाय किंवा नोकरी करता मात्र घरामध्ये पैसा येत नाही. त्या उद्योग-व्यवसायात, नोकरीमध्ये आपली प्रगती होत नाही. आपला व्यवसाय ठप्प पडलेला आहे. याचे कारण कोणतेही असो.
मात्र हा उपाय केल्यानंतर आपल्याला दिसेल की आपला व्यवसाय सुरळीत चालू लागला आहे. आपल्या नोकरी मध्ये आपल्याला यश मिळत आहे. काही दिवसातच आपण त्या उद्योगामध्ये भरारी घेतलेली, प्रगती झालेली आपल्याला दिसून येईल.
ज्या गोष्टीबद्दल, वस्तू बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत ती वस्तू सामान्यातील सामान्य व्यक्ती आपल्या घरात ठेवू शकतो. ज्योतिष शास्त्रामध्ये देखील या उपायाचा उल्लेख आढळतो. हा उपाय भरपूर लोकांनी केलेला आहे व याचा अनुभव घेतलेला आहे.
याचा फायदा देखील त्यांना झालेला आहे. मात्र खंत अशी वाटते की लोक अशा प्रकारचे उपाय एकमेकांना सांगत नाही. या उपाय बद्दल तुम्हाला माहिती मिळाल्यानंतर तुम्ही करून पहा आणि हा उपाय इतरांना नक्की सांगा.
इतरांना सांगून त्यांच्यावर सुद्धा माता लक्ष्मीची कृपा, स्वामींची कृपा होईल. त्यांना सुद्धा स्वामींचे आशीर्वाद मिळतील. चला तर पाहूया काय आहे हा उपाय.
उपाय असा आहे की आपल्या घराचे मुख्य प्रवेशद्वार आहे म्हणजे मुख्य दरवाजा आहे त्या दरवाजाच्या जवळ पाणी भरलेली एखादी वस्तू नक्की ठेवा. मग ती छोटीशी का असेना. ही वस्तू ठेवण्याचे काही नियम आहेत. ते पाहूयात.
मुख्य दरवाजा जवळ पाण्याने भरलेली वस्तू ठेवा. वास्तुशास्त्रानुसार हा खूप प्रभावी उपाय आहे. पण याचे काही नियम पाळावे लागतात. पहिली गोष्ट म्हणजे आपण दरवाजा जवळ जी वस्तू ठेवणार आहोत ती अत्यंत मंगलदायी वस्तू असणार आहे.
आपल्या दरवाजाच्या केवळ डाव्या बाजूलाच ही वस्तू ठेवायची आहे. घराच्या आत डाव्याबाजूला म्हणजेच घरातून बाहेर बघताना जी डावी बाजू येईल त्या बाजूला ही वस्तू ठेवायची आहे. हे नियम आहेत आणि आपण अगदी कटाक्षाने पाळायला पाहिजे.
कारण ही दिशा ठरवणार आहे आपल्याला कोणत्या प्रकारचे फळ मिळणार आहे ते. जर हा उपाय तुम्ही चुकीचा केला म्हणजे जर तुम्ही वस्तू दरवाजाच्या उजव्या बाजूला ठेवली तर फायदा तर होणार नाही मात्र तुम्हाला याचा वाईट परिणाम भोगावे लागेल.
दुसरी गोष्ट अशी की काही लोक घराच्या दोन्ही बाजूला ही वस्तू ठेवतात. कारण प्रचंड पैसा येईल असे त्यांना वाटते. पण असे काहीच होत नाही. याउलट त्या घरावर खूप मोठे संकट येते. म्हणून फक्त डाव्या बाजूला ही वस्तू ठेवावे.
तुम्ही जे काही भांड ठेवलेलं आहे ते फक्त स्वच्छ असावं. जेणेकरून त्याचे फळ तुम्हाला लवकरात लवकर नक्कीच मिळेल.
तर मित्रांनो या नवरात्रात हा उपाय नक्की करून पहा. धन्यवाद.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.