आयुष्यात काहीच पडणार नाही कमी… फक्त करा हे एक काम… करा स्वामींची सेवा…

नमस्कार मित्रांनो,

ब्रह्मांडनायक स्वामी समर्थ महाराजांच्या अनेक लीला केवळ अद्भूत आणि अचंबित करणाऱ्या आहेत. स्वामींचा भक्त परिवार मोठा आहे. फक्त महाराष्ट्रातच नाही, तर देशभरात स्वामी समर्थ महाराजांचे मठ असल्याचे दिसते. त्यामुळे जर तुमच्या जीवनात असंख्य समस्या किंवा अडचणी निर्माण झाल्या तर, तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांची ही एक विशेष सेवा नक्की करा.

मित्रांनो जर आपण स्वामींची ही एक सेवा केली तर, आपल्या जीवनातल्या अडचणी किंवा दुःख, गरिबी या समस्या असतील, काही अडचणी असतील, त्या सर्व अडचणी दूर होतील.

आपल्या मनात काही प्रश्न असतात, किंवा आपल्याला कोणत्या गोष्टी तुन बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळत नसतो किंवा जीवनात सतत अपयश मिळत असते. स्वामींची ही एक सेवा केली तर आपले प्रत्येक काम पूर्ण होण्यास सुरुवात होते तसेच प्रत्येक अडचणी दूर होतात आणि आपल्यावर श्री स्वामींची कृपा होते आणि या गोष्टीचा अनुभव भरपूर भक्तांनी या प्रभावी सेवेचे अनुभव घेतलेले आहेत.

मित्रांनो जर तुम्हालाही तुमचे जीवन सुखी करायचे असल्यास, किंवा तुम्हालाही जीवनात आनंदी राहायचे असल्यास, तुम्ही सुद्धा स्वामींची ही प्रभावी सेवा नक्कीच केली पाहिजे, तुम्हाला फक्त सेवेमध्ये एक गोष्ट करायची आहे.

आपल्याला जी गोष्ट करायची आहे ती म्हणजे आपल्याला स्वामी चरित्र सारामृत या पारायणाचे वाचन करायचे आहे आणि अपल्याला या पारायणाचे आपल्याला 51 पारायण पूर्ण करायचे आहेत.

मित्रांनो या श्री स्वामी चरित्र सारामृत मध्ये एकूण 21 अध्याय पूर्ण केले, तर आपले एक पारायण पूर्ण होते. असे आपल्याला 51 पारायण पूर्ण करायचे आहेत.

हे 51 पारायण पूर्ण करण्यास तुम्हाला किती वेळ लागतो ते तुमच्यावर आहे. कारण कोणी 2 किंवा 3 महिन्यात तर कोणी 6 महिन्यात पूर्ण करीत असते, तर कोणी एका वर्षात करतं. ते तुमच्यावर आहे.

आपल्याला फक्त 51 पारायण पूर्ण करायचे आहे. रोज एक अध्याय वाचला तरी चालेल. रोज 3 ते 4 वाचले तरी चालते किंवा रोज 1 पारायण पूर्ण केले तरी चालते. हे तुमच्यावर आहे 1 किंवा 2 अध्याय तसेच रोज एक पारायण पूर्ण करा तुमच्यावर आहे.

फक्त तुम्हाला 21 अध्याय पूर्ण झाल्यानंतर एक पारायण होते हे समजून घ्या. या प्रकारे आपल्याला 51 पारायण पूर्ण करायचे आहेत. ज्यावेळेस तुमचे 51 पारायण पूर्ण होतील, त्या वेळेस तुम्हाला अनुभव नक्की येतील.

त्या नंतर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील, जीवनात कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही तसेच कोणत्याही अडचणी राहणार नाही. त्यामुळे तुम्ही ही श्री स्वामी समर्थ महाराजाची ही प्रभावी सेवा नक्की करावी.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.

अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *