नमस्कार मित्रांनो,
अगदी सहज रित्या उपलब्ध होणाऱ्या कमालीच्या वनस्पतीचे एक चमचाभर चूर्ण फक्त 7 दिवस आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ करा.
तुमच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या चरबीच्या गाठी असतील तर त्या पूर्णपणे वितळून जातील. कोणताही त्वचा रोग असेल, उष्णतेमुळे अंगावर पुरळ येत असेल, पित्त उठत असेल त्याचबरोबर तुम्हाला वात किंवा सांधेदुखीचा त्रास होत असेल किंवा डोकेदुखीचा त्रास असेल अशा अनेक समस्या या चमत्कारिक वनस्पतीने मुळासकट पूर्णपणे बरे होतात.
चला तर ही वनस्पती कोणती आहे, याचा वापर कसा करायचा या सर्व आपण जाणून घेणार आहोत.
ही वनस्पती तुम्हाला कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये मिळते. त्याशिवाय घराच्या आजूबाजूला सर्वत्र उपलब्ध असणारी ही वनस्पती आहे. असे एक ही गाव किंवा घर नसेल किंवा शहर नसेल जिथे तुम्हाला ही वनस्पती उपलब्ध होणार नाही.
अगदी सर्वांच्या परिचयाची ही वनस्पती आहे. कोणत्याही प्रकारचा त्वचारोग, फंगल इन्फेक्शन या सर्वांसाठी ही वनस्पती अत्यंत औषधी आहे. ती वनस्पती आहे नागरमोथा. या वनस्पतीला मराठीत लव्हाळा आणि हिंदी मध्ये नागरमोथा म्हटले जाते.
नागरमोथा चूर्ण हे आपल्याला मेडिकल मध्ये अगदी सहजरीत्या मिळते. ही वनस्पती सर्वत्र उपलब्ध असते. आजही ग्रामीण भागामध्ये त्वचा रोग असलेल्या व्यक्तीला नागरमोथा या वनस्पतीच्या बुडाची माती अंगाला लावून आंघोळ घातली जाते.
यामुळे अंगावरच्या चरबीच्या गाठी वितळून जातात. फार पूर्वीपासून हा उपाय आयुर्वेदामध्ये आहे. अत्यंत उपयोगी ही वनस्पती आहे.
थंडीमध्ये वातीचा त्रास, सांधेदुखीचा त्रास बऱ्याच जणांना होतो. तर अशा व्यक्तींना सुद्धा या वनस्पतीचा खूप फायदा होतो.
तर या वनस्पतीचे चूर्ण तुम्हाला आणायचे आहे. जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर नागरमोथा म्हणजेच लव्हाळा उपटल्यानंतर त्याच्या बुडामध्ये जी गाठ निघते, कंद निघतो असे दोन कंद आणायचे आहेत आणि ते कुटायचे आहेत. ओले किंवा वाळवून घेतले तरी चालेल.
अंघोळीचे पाणी गरम करत असताना त्यामध्ये या कंदाचा कुट किंवा पावडर एक चमचा त्या पाण्यात टाकायची आहे. हे पाणी तुमच्या तोंडात गेले तरी याचा कोणताही साईड इफेक्ट होत नाही.
हे पाणी गरम झाल्यानंतर या पाण्याने अंघोळ करायची आहे. हा उपाय तुम्हाला सलग सात दिवस करायचा आहे. या उपायाने अंगावर येणाऱ्या चरबीच्या गाठी, पुरळ, घामोळ्या, पित्त असा कोणताही त्रास पूर्णपणे निघून जातो.
त्याचबरोबर बऱ्याच व्यक्तींना डोकेदुखीचा त्रास असतो. अर्ध डोकं दुखतं. तर अश्या व्यक्तींचा डोकेदुखीचा त्रास या सात दिवसाच्या उपायामुळे पूर्णपणे निघून जातो.
त्याचप्रमाणे बऱ्याच जणांना मिरगी किंवा चक्कर येण्याची समस्या असते. तेसुद्धा या उपायांमुळे पूर्णपणे बरे होते. तुमचा शरीर पूर्णपणे शुद्ध होतं. या नागरमोथा मुळे तुमचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि त्यामुळे विविध प्रकारचे आजार निघून जातात.
या वनस्पतीचा वापर तुम्ही ताजा किंवा चूर्ण स्वरूपात ज्या प्रकारे उपलब्ध असेल त्याप्रमाणे करा. या वनस्पतीचा केसांना सुद्धा चांगला फायदा होतो. अत्यंत उपयोगी ही वनस्पती आहे.
तर मित्रांनो या वनस्पतीचा वापर तुम्ही नक्की करा. याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. धन्यवाद.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.