नमस्कार मित्रांनो,
खूप पैसा येण्यासाठी फक्त पाच मिनिटे आपल्या हाताच्या मुठीत ठेवा हे मीठ. माता लक्ष्मीची कृपा होईल. स्वामी समर्थांची कृपा होईल. काही दिवसातच तुम्हाला चमत्कार पाहायला मिळेल.
तुम्ही मिठाचे अनेक प्रयोग केले असतील. अनेक उपाय ऐकले असतील. तुम्हाला असं सांगितलं जातं की काचेच्या वाटीमध्ये मीठ ठेवा. अमुक ठिकाणी ठेवा. पण आजचा जो उपाय आहे तो खूपच विशेष आहे.
कदाचित हा प्रयोग, हा उपाय याआधी तुम्ही कधीच ऐकला ही नसेल. त्यामुळे हा उपाय तुम्ही लक्षपूर्वक वाचा. जेणेकरून तुम्ही याचा पूर्णपणे लाभ घेऊ शकता.
आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये अनेक लोक चिंतेने, समस्येने, मानसिक तणाव या मध्ये घेरले गेले आहेत. त्यामुळे त्यांचं कोणत्याही गोष्टींमध्ये मन लागत नाही. लोक डिप्रेशनमध्ये आहेत. काहींना पैशांचा प्रॉब्लेम आहे.
आर्थिक अडचणींमध्ये आहेत. घरात कोणत्या न कोणत्या प्रकारचे संकट, अडचण, आजारपण आहे. या सर्व संकटांतून मुक्त होण्यासाठी, आजारपण या सर्व गोष्टींपासून दूर होण्यासाठी आज आपण येथे मिठाचा हा उपाय पाहणार आहोत.
मित्रांनो, हा उपाय तुम्हाला इतका प्रभावशाली ठरेल की तुम्ही स्वतः आश्चर्यचकित व्हाल. अनेक तंत्र शास्त्रामध्ये, अनेक ज्योतिष शास्त्रामध्ये, वास्तुशास्त्रामध्ये मिठाला खूप मोठं महत्त्व आहे. पण आजही काही लोकांना मिठाचा योग्य उपाय, योग्य फायदे माहीत नाहीत.
आजचा जो उपाय आहे तो उपाय केल्याने जीवनातील सर्व आर्थिक अडचणी, आजारपण, वास्तुदोष, ग्रह दोष नाहीसे होतील. तुमचं भविष्य बदलून जाईल. कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा, वाईट शक्ती, कोणतीही बाधा असेल तुमच्या घरापासून दूर होतील.
अशा काही समस्या असतील ज्या समस्यांमुळे तुम्हाला रात्रभर झोप येत नसेल. या समस्या दूर होतील. तुम्हाला चांगली झोपही लागेल. तुमचं मन विचलित होत असेल तर मानही विचलित होणार नाही. तुमच्या मनात जे आहे ते सर्व पूर्ण होईल.
या उपायासाठी आपल्या दोन्ही हाताच्या ओंजळीमध्ये मीठ घ्यायचे आहे. आपल्याला एवढेच मीठ द्यायचे आहे जेवढे हाताच्या मुठी मध्ये झाकू शकू. ते मीठ बाहेर कोणालाही दिसता कामा नये. संपूर्ण मुठीमध्ये बंद करता येईल.
हा उपाय आपल्याला सोमवार, बुधवार, शुक्रवार या तीन दिवसापासूनच सुरू करायचा आहे. मग तो तुम्ही सोमवारी करा, बुधवारी करा किंवा शुक्रवारी करा. या तीन दिवसापासूनच सुरू करायचा आहे.
जर तुम्ही सोमवारी हा प्रयोग सुरू केला असेल तर सोमवार, मंगळवार आणि बुधवार असे तीन सलग दिवस हा उपाय करायचा आहे. आपल्या हाताच्या ओंजळीमध्ये, मुठीमध्ये मीठ घ्यायचे आहे आणि आपल्या इष्ट देवतेचे नामस्मरण करायचे आहे.
किंवा माता लक्ष्मीचे, गणपतीचे, विष्णू देवांचे, स्वामी समर्थांचे कोणाचेही नामस्मरण करा. प्रार्थना करायची आहे की आपल्या मनात काही नकारात्मक विचार आहेत, माझ्या मागच्या अडचणी, बाधा, त्रास आहे ते सर्व दूर होऊन माझ्या ओंजळीतील मिठामध्ये येत आहे.
अशी आपण कल्पना करायची आहे. असे केल्याने आपल्या मनातील वाईट विचार, माझ्या मागील अडचणी सर्व निघून जातात. आपण सकारात्मक विचार करू लागतो. आपल्या मनातील मानसिक तणाव, वाईट गोष्टी ज्या आहेत त्या मिठामध्ये जात असतात आणि त्यानंतर हे मीठ बेसिन किंवा बाथरूममध्ये टाकून द्यावे.
यामुळे आपल्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ लागते. आपण प्रत्येक गोष्टीला सकारात्मक नजरेने बघू लागतो. सकारात्मक विचार करू लागतो आणि सर्व गोष्टी आपल्या हातून सकारात्मक होऊ लागतात.
मग तुम्ही तुमच्या आर्थिक परिस्थिती चालू शकता. सकारात्मक विचार करू शकतात. तुमच्या घरामध्ये सकारात्मक विचार येतील आणि नकारात्मक विचार तुमच्या आयुष्यातून निघून जातील. तुमच्या आयुष्यात सर्व चांगलेच घडेल.
तर मित्रांनो हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. हा उपाय केल्याने तुमचे आयुष्य बदलून जाईल. धन्यवाद.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.