नमस्कार मित्रांनो,
सर्व शुभ मंगल कार्यामध्ये सर्वात पहिला हळदीचा वापर केला जातो. आपल्या रोजच्या जीवनात हळद ही असतेच. स्वयंपाक करताना पदार्थांमध्ये हळद घातली तर त्यांची रूपच पालटते व पदार्थ लजेदार बनते.
हळद ही जंतुनाशक आहे. म्हणुन हळदीचा वापर जखम झाली, खरचटले तर यावरही केला जातो. इतकी ही गुणकारी हळद विविध उपाय तोडगामध्ये वापरली जाते.
हळदीचा उपयोग करून आपल्या जीवनातील विविध
संकटांना दूर करू शकतो.
लक्ष्मी प्राप्तीसाठी ही हळदीचे विविध उपाय आपल्या ज्योतिष शास्त्रात दिलेले आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये ही हळद खूपच मानली गेली आहे. म्हणुन कोणत्याही शुभ व मंगल कार्यास सर्वात आधी हळदीचा वापर केला जातो. हळदीमधील विविध गुणधर्म आहेत व दैवीशक्ती आहे. अशा सर्व गुण संपन्न हळदीचा एक खूप खास उपाय आज आपण बगणार आहोत.
जर आपण आपल्या जीवनात काही संकटे असतील, अडचणी असतील त्यापासून आपल्याला सुटका मिळवायची असेल, आर्थिक अडचण असेल, आपल्या कष्टाच्या मानाने हातात पैसा येत नसेल, हातात पैसा येत असेल परंतु तो टिकत नसेल, आपल्या कौटुंबिक व वैवाहिक जीवनात काही अडचणी असतील, मतभेद असतील,
घरात नेहमी भांडण तंटे होत असतील व वादविवाद होत असतील, नोकरी व्यवसाय संबंधी जर काही अडचणी असतील, धन प्राप्तीची इच्छा असेल पण या इच्छा व मनोकांनाची पूर्ती होण्यासाठी तसेच अशा प्रकारच्या बाधापासून सुटका मिळवण्यासाठी आपण हा उपाय करू शकतो.
यासाठी आपल्याला दैनंदिन वापरातील हळदीचा वापर करायचा आहे. उपाय अगदी साधा व सोपा आहे. आपल्याला फक्त एक वस्तू आपण आपल्या हळदीच्या डब्यात ठेवायची आहे. कधी कधी असे होते की आपला व्यवसाय तेजीत चालत असतो, आपली प्रगती होत असते,
नोकरी व्यवसाय अगदी मस्त चालेल असतात. घरात अगदी छान वातावरण असते आणि अचानक घरात वादविवाद, भांडण तंटे निर्माण होऊ लागतात. व्यापार व्यवसाय मंदावतो, नोकरीमध्ये काही अडचणी येऊ लागतात.
घरात अ शांतता निर्माण होते. पैशाला पैसा लागत नाही.
घरात आर्थिक अडचणी जाणवू लागतात. त्यावरून घरातील सदस्यांशी खटके उडू लागतात किंवा वादविवाद होऊ लागतात. घरात कोणीना कोणी सतत आजारी पडू लागतो. आपल्याला समजत नाही असे का होत आहे. परंतु हा सर्व करणी म्हणजेच भानामतीचा प्रकार असतो.
आपली प्रगती कोणाला भगवंत नाही. म्हणून असे प्रकार होत असतात. आपल्या आसपास राहणारे, आपल्याशी गोडगोड बोलणारे आपले असे काही गुप्त शत्रू असतात
जे नेहमी आपले वाईट व्हावे. यासाठी काहींना काही गुप्त कार्यवाया करीतच असतात.
या सर्व जादूटोणा, करणी,वभानामती यापासून आपली सुटका होण्यासाठी या सर्वांपासून आपण सुरक्षित राहण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्यास ज्या व्यक्तीने आपल्यावर करणी केली आहे ते त्याच्यावरच उलटेल व आपल्यावर त्या वाईट शक्तींचा, वाईट प्रयोगांचा काहीही प्राभाव पडणार नाही.
यासाठी आपल्याला फक्त चार ते पाच सुख्या मिरच्या आपल्या हळदीच्या डब्यामध्ये ठेऊन द्यायचे आहे. या मिरच्या अगदी कोरड्या खणखणीत असाव्यात. ताज्या मिरच्या अजिबात ठेऊ नये.
वाळलेल्या च लाल मिरच्या आपल्याला आपल्या हळदीच्या डब्यात ठेवायचं आहे. काही दिवसांनी या मिरच्या काढून आपण आपल्या स्वयंपाकात वापरू शकता. हळदीच्या डब्यात ठेवलेल्या या मिरच्या आपल्याला थोडया थोड्या दिवसांनी बदलायचं आहे.
आणि आदींच्या मिरच्या आपल्याला स्वयंपाकात वापरायचं आहे. असे केल्याने जर तुमच्यावर कोणी करणी केली असेल, आपल्या कुटूंबावर जर वाईट शक्तींचा प्रभाव असेल त्यापासून आपले आणि आपल्या कुटुंबाचे संरक्षण होईल. परंतु या मिरच्या काढल्यानंतर त्या ठिकाणी नवीन मिरच्या ठेवायचे आहे.
आपल्या जीवनातील अडीअडचणी व संकटांपासून या उपायांमुळे आपली सुटका होईल आणि हा उपाय अगदी साधा व सोपा आहे. आपल्याला यासाठी काहीच खर्च करण्याची गरज नाही. परंतु खरोखर प्रभावी परिणाम कारक असा उपाय आहे जरूर करून पाहा.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.