नमस्कार मित्रांनो,
आपण घरातील सदस्य मिळून, एक घर बनलेले असते. घरातील सर्व सदस्य एकमेकांशी मिळून मिसळून राहतात. घरातील सर्वां बद्दल सर्व काही माहीत असते.सर्वांबद्दल प्रेम व आपुलकी असते. परंतु घर म्हटले की भांड्याला भांडे लागतेच! कधीकधी थोड्या थोड्या गोष्टीवरून खटके उडून त्याचे वाद विवाद व भांडणात रूपांतर होते. एकमेकांची मते एकमेकांना पटत नाही.
कधी कधी वाद विकोपाला जातात. आणि एकमेकांना वाईट साईट बोलले जाते. अपशब्द बोलले जातात. कधी कधी तर इतका प्रचंड राग आलेला असतो की आपल्याच व्यक्तींना संतापाच्या भरात आपण काहीही बोलून जातो. कधीकधी त्या संतापा मागे त्या बोलण्यामागे आपला काहीही वाईट हेतू नसतो. आपण आपल्या कामाच्या त्रासामुळे आर्थिक परिस्थितीमुळे अगदी विटून जातो.
आणि आपला हाच त्रास हेच दुःख संताप बनून आपल्या तोंडातून अपशब्द द्वारे बाहेर पडते. आपण नकळतपणे कधीकधी काहीतरी भयंकर बोलून जातो. आणि आपल्याच कुटुंबातील व्यक्तीचे अहित व्हावे वाईट व्हावे असे बोलत बसतो. आपण सहज म्हणून जातो, तुझं कधीच चांगलं होणार नाही. तुला कधीच सुखं मिळणारं नाही, तू असाच मरशील अन्न अन्न करशील, पण तुला अन्न मिळणार नाही.
तुझे काम कधीच होणार नाही. तू नेहमी दुःखी व कष्टी राहशील, पैसा नको करू पैसा आज आहे तर उद्या नाही! एक ना अनेक कितीतरी प्रकारे आपण एकमेकांना उने धूने अपशब्द बोलत असतो. परंतु आपल्याला हे माहीत आहे का? की आपले घर म्हणजे वास्तू या वास्तूमध्ये वास्तुपुरुष निवास करीत असतो. आणि दिवसातून एकवेळा तथास्तु म्हणत असतो.
आपण जर नेमके त्याच वेळी घरातील एखद्या सदस्याला काहीतरी वाईट साईट अपशब्द बोलत असलो तर त्या गोष्टीला वास्तुपुरुष तथास्तु म्हणत असतो. सारखे सारखे आपण अपशब्द बोलले गेल्याने त्या सर्व बाबींची फळे, म्हणजे आपणच बोललेल्या शब्दांचे वाईट परिणाम आपल्या समोर येऊ लागतात. घरातील सदस्य आजारी पडायला लागतात.
उत्पन्न कमी होते, आर्थिक समस्या निर्माण होतात, घरात दारिद्र्य प्रवेश करते. समाजात आपला मान सन्मान कमी होऊ लागतो. कधीकधी घरांमध्ये वंश बुडीही होते, अपत्य होत नाही. मुलामुलींचे विवाह होत नाही. प्रत्येक कार्यात अडथळे येण्यास सुरूवात होते. हळूहळू आपली परिस्थिती बिकट होऊ लागते. आपल्याला असे का होते आहे? हे समजत नाही.
आपण विचार करतो असे हे चक्र कसे उलटे भिरते. सगळे व्यवस्थित होते हे सर्व कसे काय बदलले! आपल्याला वाटते की आपल्यावर भगवंतांचा कोप झाला आहे. किंवा कोणीतरी आपल्यावर करणी केली आहे. काळी जादू केली आहे, कोणालातरी आपले चांगले झालेले सहन झाले नाही म्हणूनच असे होत आहे. परंतु या सर्वांचे मूळ कारण आपण स्वतः आहोत.
आपले वाईट बोलणे हे आपल्या लक्षातच येत नाही. आपण स्वतःहून हे संकट स्वतःवर ओढवून घेतलेले असते. आपण जे मागतो जे बोलतो, तेच सर्वकाही आपल्याला मिळत असते. आपल्या घरातील वास्तुपुरुष प्रसन्न मनाने, आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तथास्तु म्हणत असतात. परंतु त्यावेळी आपण अशुभ व वाईट बोलत असलो, तर आपल्याला तिची फळे मिळतील.
<
आपण जर सर्वांशी घरात चांगली वर्तणूक ठेवली. सर्वांना चांगलेच बोललो. आपले व इतरांचे भले व्हावे, ही इच्छा केली. तेच सांगितले तर आपल्याला सुख व समृद्धी मिळते. परंतु कळत नकळ पणे आपण ज्या काही चुका करतो, जी काही वाईट कर्मे करतो, त्याची वाईट फळे आपल्याला सहन करावी लागतात. म्हणून घरात नेहमी बोलताना चांगलेच व शुभ बोला. सकारात्मकच बोला. म्हणजे जे होईल ते चांगले शुभ सकारात्मकच होईल. वाईट बाबींचा नकारात्मक गोष्टींचा त्याग करा आणि जे चांगले शुभ असेल त्याचा स्वीकार करा.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.