नमस्कार मित्रांनो,
अनेक देवी देवतांच्या मंत्राचा जप करण्यासाठी आपल्या घरात जप माळ ठेवतो. ही जपमाळ अनेकदा तुळशीची असते. कधी रुद्रक्ष्यांची असते. स्फटिक ची असते. जपमाळ कोणतीही असूद्या. जपमाळ बाबत चे नियम आपण कटाक्षाने पाळा. फायद्या ऐवजी मोठ्या प्रमाणत नुकसान होईल. विशिष्ट देवी देवतेचा क्रोध उत्पन्न होऊ शकतो.
जपमाळे विषयी हिंदू धर्म शास्त्र अस मानत की जपमाळ शिवाय न मोजता केलेलं जप हे सर्व कर्म निष्फळ आहे. म्हणजेच कोणत्याही मंत्राचा जप करण्यासाठी जप माळेचा वापर केला तर त्याचे फळ कित्येक पटीने अधिक प्राप्त होत. मंत्राचा जप हा जपमाळ वर करावा. मात्र जप करताना एकच माळे वर वेगवेगळ्या देवी देवतांचे जप करू नये.
एकच माळे वर वेगवेगळ्या मंत्राचा देवीदेवतांचे जप करण्यास हिंदू धर्म शास्त्र मनाई करते. जर तुमची इच्छा असेल तर आपण वेगवेगळ्या देवी देवतांचे जप करू शकता. मात्र सौम्य आणि उग्र अशा दोन देवी देवतांच्या मंत्राचा एकत्रित जप एका माळे वर करू नये. लक्षात घ्या एखादी देवता सौम्य आहे.
आणि एखादी देवता उग्र आहे उदरणार्थ काली माता ही उग्र देवता आहे. तर एकच माळे वर काली मातेचा जप आणि त्याच माळेवर श्री हरी विष्णू चा जप करून चालणार नाही. दुसरी गोष्ट शक्यतो आपली जी माळ आहे. ती दुसऱ्या कोणाच्या हाती जाणार नाही. याची सुद्धा काळजी घ्या. ती कधीच खुंटीला अडकवून ठेवू नका.
त्यासाठी आपण एखादी डबी किंवा वाटी करू शकता. आपल्या जपमाळ चा कधी अनादर करू नका. दररोज नित्यनेमाने त्या जप माळे वर एक फुल अवश्य वाहा. आणि आपल्या घरात कितीही माणसे असू द्या. एका व्यक्तीने वापरलेली जप माळ ही दुसऱ्याने कदापिही वापरू नये.
आणि जर आपल्या जप माळे स अन्य कोणत्या व्यक्तीचा स्पर्श झाला चुकून झाला अशा वेळेस जपमाळ ला पंचगव्याने स्नान घालावे म्हणजे ती शुद्ध होते. मित्रानो जपमाळ च माहात्म्य खूप मोठे आहे. या जप माळ मुळे किती मंत्र झाला आपण किती मंत्र म्हणालो आपल्याला अचूक कळते. आणि ही माळ रुद्राक्ष व तुलसी पासून बनली असल्यामुळे या पवित्र वस्तूंचे सानिध्य आपल्याला सहजासहजी प्राप्त होत लाभत.
आपण जेव्हा जप करतो तेव्हा आपण अंगठ्यामध्ये आणि बोटांमध्ये घर्षण निर्माण होत. त्यातून निर्माण होणारी विद्युत शक्ती ही विलक्षण असते. ती आपल्या शरीरातील नसांद्वारे आपले हृदय प्रभावित करते. आपल्या मनाची एकाग्रता वाढवते. मित्रानो विशेष करून विशिष्ट्य देवतेची तिथी असेल,
एखादा उत्सव काळ असेल, या काळा मध्ये केलेला देवतेचा नाम जप अत्यंत प्रभावी ठरतो. कारण त्या दिवशी त्या तिथीला त्या विशिष्ट देवतेचे तत्त्व हे मोठ्या प्रमाणत कार्यरत असत. मग देवतांचा जन्म दिवस असेल उत्सव असेल त्या त्या काळा मध्ये आपण अधिकाधिक नाम जप करा. तितकं जास्त त्या देवतेचे तत्त्व तुम्ही ग्रहण करू शकाल.
<
अनेक लोक एखाद्या देवतेच्या मंत्राचा जप करू लागतात. लागू दिवस त्या मंत्राचा जप करतात आणि काही दिवस नंतर हा जप बदलतात. थोडक्यात काही दिवस भगवान श्री प्रभू रामांच नाव घ्यायचं आणि काही दिवस श्री विष्णुंच नाव घ्यायचं कुणीतरी सांगत आणि त्यांच्या सांगण्यावरून दिगंबरा दिगंबरा अशा प्रकारे दत्त भक्तिकडे वळतो.
मित्रानो भक्ती सर्व देवी देवतांची करा. मात्र ज्या देवतेचा तुम्हाला चांगला अनुभव आलेला आहे. ज्या देवतेचे मंत्र स्मरण केल्याने तुम्हाला आनंद वाटतो. काही आध्यात्मिक अनुभव तुम्हाला येतात. तो च मंत्र तुम्ही शेवटच्या श्वासापर्यंत घट्ट पकडून ठेवा. शेवटचा श्वास सुटताना सुद्धा तो च मंत्र आपल्या तोंडून बाहेर पडावा.
आयुष्यभर घेतलेला मंत्र शेवटच्या क्षणी जो घेतो. त्याला मुक्ती लवकर मिळते. मित्रानो जपमाळ विषयी ही माहिती काही वाटली आम्हाला कळवा.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.