दुकानात ग्राहक येत नसतील तर करा हा उपाय, ग्राहक नेहमी येतील.

नमस्कार मित्रांनो,

आजच्या स्थितीत सगळीकडे स्पर्धा चालू आहे. एकाने एक व्यवसाय सुरू केला व तो चांगला चालू लागला की लगेच दुसरी व्यक्ती तो व्यवसाय सुरु करते. यामुळे पहिल्याच्या व्यवसायावर लगेच परिणाम होतो व दोघांमध्ये स्पर्धा सुरू होते.

आपल्या दुकानाची प्रगती व्हावी, आपल्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत. हे उपाय दक्षिण भारतात केले जातात व हे खूप परिणामकारक उपाय आहेत.

या उपायासाठी एक तुरटी चा तुकडा घ्यावा. तो मोजून सव्वा पावशेर घ्यावा. पण एकच मोठा तुकडा असावा. एका काळ्‍या कापडात तो तुकडा बांधून ती गाठोडी दुकानाच्या आतील बाजूस इतरांच्या नजरेस पडणार नाही अशा ठिकाणी बांधावी.

हा उपाय बुधवार किंवा शनिवारी करावा आणि सुर्योदया आधी किंवा सूर्यास्तानंतर अंधार असताना उपाय करायचा आहे. दिवसा हा उपाय करू नये. हा तुकडा तसाच असू द्यावा आणि बुधवारी किंवा शनिवारी अमावस्या आल्यास तो उचलून नदीत विसर्जित करावा.

त्या ठिकाणी पुन्हा तसाच दुसरा तुकडा काळा कपड्यात बांधून टांगावा. तसेच दुकानातील मंदिरात भगवंताला रोज दोन ताजी फुले अर्पण करावीत व दुसऱ्या दिवशी ती फुले उचलून एखाद्या कुंडीत टाकावेत किंवा नदीत प्रवाहित करावेत.

दुकानात प्रवेश करताना आधी उजवा पाय आत टाकावा. मग दुकानात जावे आणि आधी देवाला फुले अर्पण करावीत. अगरबत्ती ओवाळावी आणि नंतरच ग्राहकांशी व्यवहार करावा.

आता आपण दुसरा उपाय पाहूया. हा उपाय अगदी साधा व सोपा आहे. शिवाय यात फक्त एकाच वस्तूचे गरज आपल्याला पडणार आहे. हा उपाय केल्याने फक्त 24 तासात तुम्हाला तुमच्या व्यवसायात वाढ झालेली दिसून येईल.

पण फक्त ज्यांचा व्यवसाय बंद पडला आहे किंवा कमी झाला आहे त्यांनीच हा उपाय न करता ज्यांना आपला व्यवसाय वाढवायचा असेल त्यांनी हा उपाय नक्की करावा.

आपल्या दुकानात किंवा ऑफिसमध्ये इतरांना संपर्क करण्याच्या वस्तू जसे की टेलिफोन, मोबाईल, कंप्यूटर इत्यादी वस्तू असतील ज्याद्वारे आपण ग्राहकांशी कनेक्टेड राहतो अशा वस्तू नेहमी दुकानाच्या किंवा ऑफीसच्या वायव्य दिशेला म्हणजेच पश्चिम दिशा व उत्तर दिशा ज्या कोपऱ्यात येतात त्या कोपऱ्यात ठेवाव्यात.

आपल्या व्यवसायासाठी किंवा ऑफिसला जाताना घराबाहेर पडण्यापूर्वी झाडू ला एकदा नमस्कार करावा. मगच घराबाहेर पडावे. कारण आपण मानत नसलो तरीही आपल्या धर्मग्रंथांमध्ये झाडूला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते.

जेव्हा आपण झाडूला नमस्कार करतो तेव्हा साक्षात देवी लक्ष्मीला आपण नमस्कार करतो. यामुळे आपला व्यवसाय नक्कीच वाढेल. त्याशिवाय शनिवारी किंवा अमावस्येच्या दिवशी एक लिंबू घ्यावे. तो लिंबू एकदम स्वच्छ आणि डाग नसलेला असावा.

तो लिंबू एकदम ताजा व रसभरीत असावा. त्या लिंबावर काळा स्केचपेनने किंवा काळ्‍या मार्करने मोठ्या अक्षरात 370 हा आकडा काढावा. मग दुकानाच्या किंवा ऑफिसच्या मुख्य दाराजवळ जाऊन डाव्या बाजूच्या भिंतीला लिंबूचा स्पर्श करत पुढे जावे व संपूर्ण दुकानाला किंवा ऑफिसला आतून लिंबाचा स्पर्श करत परत दुकानाच्या मुख्य दरवाजाकडे उजवीकडील भिंती कडून बाहेर पडावे.

हा उपाय करताना लिंबू उचलू नये. तो दुकानातील भिंतीला स्पर्श करीत करीतच बाहेर काढावा. आधीच बाहेर एक सुरी काढून ठेवावी व लगेचच त्या लिंबाचे मधोमध चार भाग करावे. परंतु वरूनच ते चार भाग करावेत. खालून भाग जोडलेले असावेत. अशाप्रकारे तो लिंबू कापावा व लगेच चार रस्त्यावर नेऊन तो टाकून द्यावा.

लिंबू टाकायला जाताना व येताना रस्त्यावर कोणाशी काहीही बोलू नये. परत येताना मागे वळून पाहू नये. या उपायाने जर तुमच्या धंद्याला कोणाची नजर लागली असेल, ग्राहक येऊन जर काहीही न घेता परत जात असतील तर हे सर्व निघून जाईल.

तुमच्या ग्राहकांमध्ये वाढ होईल व पर्यायाने उत्पन्नात वाढ होईल. व्यवसाय व्यवस्थित चालू लागला की वरचेवर हा उपाय एखाद्या शनिवारी करत राहावे. यामुळे आपल्या धंद्याला कोणाचीही वाईट नजर लागणार नाही. ऑफिसचे कामही वेगाने होईल.

हे उपाय करावा आपल्या व्यवसायात प्रगती करून आपल्या उत्पन्नात वाढ करा.

धन्यवाद.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *