नमस्कार मित्रांनो,
काही दिवसांपूर्वीच एक कॉमेंट वाचण्यात आली की आमच्या घरामध्ये प्रचंड गरिबी आहे. गरिबी तर आहेच सोबत रोगराई आहे. सतत कोणी ना कोणी तरी आजारी पडत. त्या आजारपणातच संपूर्ण पैसा खर्च होतो. आम्ही कोणतही कार्य करायला गेलो की त्यात अपयशच येत. यश मिळतच नाही. आणि सातत्याने या गोष्टी होत आहेत.
आमचे वडील, आमचे आजोबा, पणजोबा या पिढ्यानपिढ्या पार आमच्या घरात दारिद्र्य आणि गरिबीच चालत आली. आणि आजी सुद्धा आम्ही हा शाप भोगत आहोत. माता लक्ष्मीचा आशीर्वाद कधी बरसेल माता लक्ष्मी कधी प्रसन्न होईल. आजच्या लेखामध्ये आपल्या घरातील दारिद्र्य, दुर्भाग्य, गरिबी हे घालवण्याचे उपाय व तोटके आज आपण बघणार आहोत.
काही लोक म्हणतात आमची खूप सारी शेती आहे. पण पीक पाणी व्यवस्थित येत नाही. शेतीतून नाफाच होत नाही. मित्रांनो कोणतेही कार्य असू जर त्यातून लक्ष्मी प्राप्त करायची असेल तर आपण परिश्रम व कष्ट तर करायलाच हवे. सोबतच हे टोटके सुध्दा करून पहा. आमचा अजिबात दावा नाही आहे की हे टोटके उपाय करूनच लक्ष्मी प्रसन्न होते. लक्ष्मीला परिश्रम व कष्टांची जोड ही द्यावीच लागते.
लक्ष्मीला प्रसन्न करून घेणारे उपाय पुढीलप्रमाणे. मित्रांनो जेव्हा जेव्हा तुमच्या दारासमोर भिकारी किंवा याचक येतो तेव्हा तुम्ही अन्नदान करा. तुम्ही पैसे तर त्याला द्याच सोबतच त्याला जेवू घाला कारण अन्नदान करणारा जो मनुष्य असतो तो अन्न ग्रहण केल्याने त्याचा आत्मा संतुष्ट होतो. मनापासून त्या व्यक्तीचे आशीर्वादआपल्याला व आपल्या कुटुंबाला लागतात.
कुटुंबामध्ये आपण पूर्व जन्मी किंवा अगदी कोणत्याही काळात जी काही पाप कर्म केले असतील. ती जर धुवून काढायची असेल. जर त्या पाप कर्मातून मुक्त व्हायचं असेल. तर हा सर्वोत्तम उपाय आहे. अन्नदान करा जितकं जास्तीत जास्त करता येईल तेवढं अन्नदान करा. तुमच्या घराण्याचे दोष दूर होतील.
सोबतच घराच्या आपल्या मुख्यदरवाजवरती दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला, उजव्या किंवा डाव्या बाजूला सायंकाळ होताच मोहरीच्या तेलाचा दिवा लावायला विसरू नका. मोहरीच्या तेलाला बाजारात सरसों का तेल म्हणतात. हा हिंदी शब्द आहे. तर या मोहरीच्या तेलाचे दिवे दोन्ही बाजूला लावा. किंवा एका बाजूला लावा. पण दररोज लावा.
आता दिवा दारात लावल्यानंतर तो विझनार आहे. दिवा विझल्यानंतर जे दिव्यातील तेल उरलेलं असेल तर ते तेल दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ते पिंपळाच्या झाडाच्या बुंध्यावर टाका. खोडावर टाका. मित्रानो हे जे मी तुम्हाला करायला सांगतो हा एक तोटका आहे. आपल्या घरच्या मुख्य प्रवेश दारावर लावलेला दिवा विझल्यानंतर त्या दिव्यातील उरलेलं तेल जेव्हा आपण पिंपळच्या वृक्षावर टाकतो. दुसऱ्या वाटीत घ्या.
आणि पिंपळाला अर्पण करा. मित्रांनो घरात धनाची वाढ होते.घरात पैसा वाढू लागतो. तुम्ही स्वतः अनुभव घेऊन पहा. आणि जेव्हा तुम्ही अश्या प्रकारे पिंपळाच्या झाडावर तेल ओतनार त्याच वेळी आपण पिंपळाच्या झाडंच्या मुळामधे एक दिवा लावा. व मागे वळून न पाहता तसेच घरी या. मित्रांनो धनलाभ प्रचंड गतीने वाढू लागतो.
<
या पिंपळयच्या वृक्षाच हिंदू धर्म शास्त्रात फार मोठ माहात्म्य सांगितलं आहे. सर्व देवी – देवतांचा या पिंपळामध्ये वास आहे. या संपूर्ण जगाचे पालन पोषण जे भगवान हरी श्री विष्णू करतात. त्यांचा वास ह्या पिंपळाच्या वृक्षात आहे. आणि म्हणूनच धनलाभ होण्यासाठी आरोग्याच्या समस्या सुटण्यासाठी हा एक छोटासा उपाय खूप जास्त मदत करतो.
मित्रांनो मी तुम्हाला हे सांगतोय खर पण आपला काम धंदा आपली नोकरी खूप मनापासून करा व मन लावून करा. तुमचं पूर्ण तन मन धन अर्पण करून करा. पहा तुम्हाला त्या गोष्टींमधून नक्की धन प्राप्त होईल. मित्रांनो हे झाले आता छोटे छोटे उपाय. आता कधी कधी पैसा आपल्याकडे येऊ लागतो. आणि त्यानंतर आपण उन्नमत होतो.
तर असू करू नका उतू नका मतू नका. एक छोटासा उपाय सांगतो की आलेला पैसा स्थिर ठेवायचा असेल.लक्ष्मीला जर स्थिर करायचं असेल तर नक्की काय करायचं. लक्ष्मी तुमच्या घरात येईल तिचा वावर सर्वत्र होईल. घरात होईल सर्व जण आनंदी असतील. अशा वेळी लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी जी लक्ष्मी आपल्या घरात सोनपावलांनी आलीय तिला स्थिर करण्यासाठी आणि आकस्मित खर्च येऊ नये.
अनाव्यशक खर्च होऊ नये, म्हणून व वायफळ गोष्टींवर खर्च होऊ नये, असं वाटत असेल तर दुर्गा सप्तशतीचापाठ वाचत चला. जर दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचलायला येत नसेल तर मोबाईल वर यूट्यूब वरलावून ऐका. अनेकजण महालक्ष्मीचे गुरुवारच व्रत करतात. तुम्ही सुद्धा करा.
मार्गशी्ष महिन्यामध्ये हे व्रत केलं जातं. मार्गशी्ष गुरूवारचे लाभ घ्या. किंवा तुम्ही वैभवलक्ष्मी चे पण व्रत करू शकता. अनेकजण 21 शुक्रावार करतात. तुम्ही 11 शुक्रवार केले तरी चालेल. मित्रांनो अनेकजण ऋग्वेद हा जो ग्रंथ आहे. त्यामधे श्रीसुक्त आहे. तर हे श्रिसुक्त दररोज म्हणतात. 16 महिने दररोज आपण श्रीसुक्तचा न चुकता मित्रांनो आपण पाठ केला तर माता लक्ष्मी आपल्या घरातून कधीच बाहेर जात नाही.
महिलांनी विशेष करून सकाळी उठल्यावर घराबाहेर सडा रांगोळी करावी. प्रसन्न वातावरण करावं. सकाळी 6.30 ते 7.30 दरम्यान ची वेळ माता लक्ष्मीची आपली घरात येण्याची वेळ असते. त्यावेळी सडा रांगोळी करावी.पवित्र वातावरण बनवाव. आपल्या दारासमोर की देवासमोर कमळ किंवा स्वतिक असेल तर अशा प्रकारची शुभचीन्हे अवश्य काढावी. व सकाळी लक्ष्मी लक्ष्मी गायत्री मंत्राचा 108 वेळा जप करा.
मित्रांनो हजारो गोष्टी आहेत आपण ते किती मन लावून करतो, स्वतः करतो. एकदा ह्या गोष्टी मांन लावून व पूर्ण श्रध्देने करा त्याच फळ नक्कीच तुम्हाला चांगल मिळेल माता लक्ष्मी व श्री विष्णूच्या कृपेने नक्कीच तुमचं चांगल होईल.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.