कमेंट मध्ये स्वामी समर्थ लिहून स्वामींचा आशीर्वाद घ्या स्वामी करतील सगळी संकटं दूर…

नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ,

सुमन नावाची एक स्वामी भक्त स्त्री गरो दर असताना स्वामींचा आशीर्वाद घ्यायला आपला नवरा विष्णू बरोबर येते. स्वामी म्हणतात तुला संतती मिळेल पण जे काही होणार ते सहन करायची तयारी ठेव. सुमनला स्वामी वचन खरं होणार हि खात्री होती. पण तयारी ठेव या एका वाक्यामुळे तिचा थरकाप होऊ लागतो.या एका वाक्यामुळे ती नेहमीच चिं तेत राहायची.

सुमनचा भाऊ शिवा जेव्हा स्वामी दर्शनाला येतो तेव्हा स्वामी त्याला धान्याचं रिकामं पोत देतात. शिवा त्याला स्वामींचा आशीर्वाद म्हणून स्वीकारतो. सुमन जेव्हा विहरीवरून पाणी आणत होती तेव्हा सतत विचार डोक्यात असल्यामुळे घसरून पडते. डॉक्टरांकडे गेल्या नंतर ग र्भाला मार बसला आहे असे डॉ क्टर बोलतो व ग र्भाचे निधन झाले असे सांगतो.

हे सांगितल्या नंतर डॉक्टर बोलतात कि तुम्ही पुन्हा कधीच आई होऊ शकत नाही. हे ऐकून सुमन खूपच खचून जाते. इकडे अकाळी पाऊस पडल्याने शिवाच्या सर्व पिकांचे जबरदस्त नुकसान होते. शिवाची सर्व स्वप्न धुळीस मिळतात. त्याच्यावर देशोधडीची वेळ येते. इकडे सुमनच्या मनात आ त्मह त्ये चा विचार येऊ लागलेला असतो व ती आ त्म ह त्या करण्यासाठी नदीच्या दिशेने निघते.

पण अंतरयामी स्वामी बाळप्पांना वेळेवर पाठवून सुमनचा जीव वाचवतात. स्वामी आणि बाळप्पा मध्ये संवाद होतो. स्वामी म्हणतात बाळ्या अरे आमचे भक्त असले तरी स्वकर्माने त्यांना प्राप्त झालेलं प्रारब्ध त्यांना भोगावच लागत. यावर बाळ्या म्हणतो स्वामी यावर काही उपाय नाही का? स्वामी म्हणतात अरे एकदा पापाचे विपरीत प्रारब्धात बदल झाल्यावर त्या प्रारब्धाला भोगल्याशिवाय पर्याय नाही.

सद्गुरू त्या भोगाला मागे पुढे करू शकतात पण ते प्रारब्ध भोगावेच लागतात. अरे म्हणूनच आम्ही नाम स्मरणाला एवढे महत्व देतो. मनुष्याच्या हातून कळात नकळत परिस्थिती वश होऊन पाप घडत राहतात. आणि त्याच परिवर्तन विपिरीत प्रारब्धात न व्हावे म्हणूनच ईश्वर भक्ती करायची असते. बाळ्या म्हणतो स्वामी मग अशा विपरीत प्रारब्धात मनुष्याने काय करावं?

स्वामी म्हणतात अरे जेव्हा सोसाट्याचे वारे सुटते तेव्हा मनुष्य काय करतो? आपली पांघरलेली घोंगडी घट्ट धरतो याउलट जेव्हा दुःखाचे वारे सुटते तेव्हा तो ईश्वराची कास सोडतो आणि म्हणतो मी देवाचे एवढे करतो पण माझ्यावर संकट का आले? बाळ्या पण तो हे विसरतो कि देवाची भक्ती जी आजवर त्यांनी केली ती जर केली नसती आणखी भयाण संकट आले असते.

तिकडे शेतमालाचे नुकसान झाल्यामुळे शिवा पूर्णपणे खचलेला असतो. त्याची पत्नी त्याच सांत्वन करते. पण मग त्याच्या मनामध्ये विचार येतो कि स्वामींनी धान्याचे रिकामे पोते देऊन आपल्याला जणू इशाराच दिला होता. तो खंबीरपणे उठतो आणि आपलं आयुष्य पुन्हा नव्याने उभं करायला लागतो. स्वामी त्याला सांगतात जसा तू सावरलास तस तुझ्या बहिणीने पण स्वतःला सावरलं पाहिजे.

शिवा अरे तू तिच्याकडे जा तुझ्या परीने तिला समजव. पण तिकडे सुमन वेड्यासारखी वागत असते आणि वेडेपणाच्या भरात ती गळ फा स लावायला जाते. पण योगा योगाने त्याच वेळी तिथे शिवा आणि विष्णू येऊन तिला अडवतात. तितक्यात स्वामी तिथे प्रकट होतात. स्वामी म्हणतात सुमन मर ण सोपं नसत. आणि मर ण जिवाच्या हाती नसत. लक्षात ठेव देवाने ठरवलेली वेळ नसली तर काहीही केल तरी सुटका होणार नाही.

मर ण आपल्या ठरलेल्या वेळीच येणार. सुमन आपल्या सासू, नवरा, भावाचा जरा विचार कर तुझ्या या अविचारीपणा मुळे त्यांना काय वाटले असते? सुमन यावर म्हणते स्वामी संतती नसल्यामुळे जे दुःख होत त्याच काय करू? तितक्यात शिवाची बायको शारदा सुमनला आपलं बाळ देते. शारदा म्हणते हे माझं बाळ घे, याला तू आपल्या मुलासारखं वाढव.

या मुलाची तुला जास्त गरज आहे. मला काय मला तर दुसर अपत्य होईल. स्वामी वचनाप्रमाणे सुमनला संतती प्राप्त होते. सुमन सावरते आणि आनंदाने पुढच्या आयुष्याची सुरवात करते. मित्रांनो तात्पर्य असं कि स्वामींवर विश्वास असणं, निष्ठा असंण फार महत्वाचं. प्रारब्ध हा आपल्याला भोगावाच लागतो. स्वामी प्रारब्ध भोगायला पुढे मागे करू शकतात पण तो प्रारब्ध टाळू शकत नाहीत.

भक्ती, सेवा, नामस्मरण अत्यंत महत्वाचं आहे. आपल्या भक्तीमुळे येणारे संकट, दुःख जे जितक्या भयानक पद्धतीने येऊ शकतात ते आपल्या सेवेमुळे, भक्तीमुळे तितक्या भयानक स्वरूपात येत नाहीत. याचा आपणास विसर पडता कामा नये. सुख असो किंवा दुःख या दोन्ही वेळेस आपल्या स्वामी भक्तीवर आपण ठाम असावे. फक्त दुःखातच स्वामींची देवांची आठवण नको.

मित्रांनो मरण हे ठरलेल्या वेळेतच येणार. आधी नाही आणि नंतर देखील नाही कारण जगी जन्म मृ त्यू असे खेळ ज्यांचा. श्री स्वामी समर्थ.

मित्रांनो कथा आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत नक्की शेयर करा.

अशाच आणखी सुंदर पोस्ट वाचण्यासाठी आत्ताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *