नेहमी चांगल्या माणसांसोबत देव वाईट का वागतो? स्वामी समर्थांनी उत्तर दिले.

नमस्कार मित्रांनो,

श्री स्वामी समर्थ. मित्रांनो आपल्या मनात येते की, आपण कोणाचे वाईट केले नाही तरी माझ्या सोबत एवढे वाईट का होते? मी तर नेहमी देवावर विश्वास ठेवतो, त्याची सेवा करतो, चांगल्या मार्गावर चालतो, चांगले कर्म करतो तरी माझ्यासोबत असे वाईट का होते असे विचार तुमच्या मनात भरपूर येतात, लोकांच्या मनात येतच असतात.

अशा सगळ्या प्रश्नाची उत्तर स्वामी समर्थांनी दिलेली आहे. एकदा अर्जुन कृष्णाला विचारतो हे वासुदेवा नेहमी खरे आणि चांगल्या माणसांसोबत असे वाईट का होते? यावर कृष्णाने एक गोष्ट सांगितली त्या गोष्टीमध्ये सगळ्या मनुष्यांच्या प्रश्नांची उत्तरे आहेत. कृष्ण म्हणतो की, एका नगरामध्ये दोन पुरुष राहत होते.

पहिला व्यापारी होता आणि चांगला माणूस होता. धर्म आणि नीतीचे पालन करायचा. चांगले कर्म करायचा, देवाची भक्ती करायचा, मंदिरांमध्ये जाऊन देवांची सेवा करायचा. सगळ्या चुकीच्या कामापासून दूर राहायचा. आणि जो दुसरा माणूस होता तो वाईट प्रवृत्तीचा होता. वाईट कामे करायचा खूप, खोट बोलायचा, नेहमी नीती आणि अधर्म कामे करायचा.

तो नेहमी मंदिरातून चप्पल आणि पैसे चोरायचा. वाईट संगतीत होता आणि व्यसनी होता. एके दिवशी त्यांना जोरदार मुसळ पाऊस सुरू झाला आणि मंदिरांमध्ये कोणीच नव्हते. हे बगून वाईट माणूसाने मंदिरातील सर्व पैसे चोरले आणि तिथून पळून गेला. थोड्या वेळात तो चांगला व्यापारी मंदिरात दर्शन करण्याचे या हेतूने तिथे आला.

तर लोकांनी त्याच्यावर चोरीचा आरोप केला. तिथे असलेल्या सर्व लोक त्याला वाईट बोलू लागले, चोर म्हणू लागले, खूप अपमान केला. तिथून कसाबसा मंदिरातून बाहेर आला. तिथून कसा तरी आल्यानंतर त्याला एका बैलाने मारले. तो गंभीर जखमी झाला आणि पुढे गेल्यावर त्या वाईट माणसाला आणखीन एक पैशाने भरलेलं पोते मिळाले आहे.

तो विचार करू लागला आजचा दिवस किती चांगला आहे आता मंदिरातून धन मिळाले आणि परत एवढा पैसा मिळाला. जखमी झालेल्या माणसाने हे सर्व ऐकले तो घरी आला. त्याने घरी येऊन त्याच्या घरातील सर्व देवांच्या मूर्ती आणि फोटो काढून टाकले देवावर रुष्ट होऊन जीवन जगू लागला. खूप वर्षांनंतर त्या चांगल्या माणसाचा आणि वाईट माणसाचा मृत्यू झाला.

तेव्हा यमराजांच्या समोर गेले आणि चांगल्या व्यक्तीने यमराजाला प्रश्न विचारला. मी तर नेहमी चांगले कर्म केले, कोणाचे वाईट केले नाही तरी मला दुःख का? मला सारखा अपमान का मिळाला? आणि यमराजांने त्याला उत्तर द्यायला सुरुवात केली. ज्या दिवशी तुला बैलाने मारण्याचा प्र य त्न केला त्या दिवशी तुजा मृत्यूचा दिवस होता. पण तुला तो मृत्यू एका जखमेमध्ये प्र वृ त्त झाला.

आणि त्या दुर्घटनेत तू वाचला आणि वाईट माणसाला राजयोग प्राप्त होणार होता. पण त्याच्या वाईट कर्मामुळे तो राजयोग एका धन्याच्या पोत्यामध्ये प रि व र्ति त झाला. भगवंत तुमची साथ कोणत्या स्वरूपाने देतो हे सांगणे कठीण असते. परंतु तुमचे चांगले वाईट कर्म पासून तुम्ही दूर राहतात. तर तुम्ही सेवा करत आहात.

ज्याला तुम्ही पूजत आहात, त्यांची कृपा तुमच्यावर नक्कीच होते. जीवनात येणाऱ्या समस्या, दुःख, संकट किंवा काहीही जे तुमच्या सोबत होत असेल त्याला कधीही हे समजू नका की, देव तुमच्या सोबत नाही आहेत. आणि तुमच्या सोबत वाईट होत आहे. असू शकते तुमच्या सोबत यापेक्षा जास्त वाईट होणार होते. यापेक्षा मोठं संकट येणार होत.

पण तुमच्या सेवेमुळे, तुमच्या चांगल्या कर्मामुळे हे सर्व जण चांगले झाले. तर मित्रांनो हे तुम्हाला अस वाटत असेल माझ्यासोबत वाईट का होते. मी तर चांगले कर्म करतो, तर मित्रांनो जे वाईट तुमच्यासोबत झाले त्याच्यापेक्षा जास्त वाईट तुमच्याबरोबर होणार होते. आणि तुमच्या चांगल्या कर्मामुळे, तुमच्या सेवेमुळे ते कमी प्रमाणात तुमच्यापर्यंत आले आहे. असे समजून तुम्ही आयुष्य जगा.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *