नमस्कार मित्रांनो,
असे म्हणतात कि लग्नानंतर नवऱ्याचे भविष्य हे त्याच्या बायको बरोबर जोडले जाते. बायको जे काही कार्य करते त्याचे फळ तिच्या नवर्यालाही मिळत असते. तसेच नवर्याने ही कोणते काम केले तर त्याचे फळ त्याच्या बायकोलाही मिळत असते.
म्हणजेच बायकोच्या प्रत्येक कार्याचा प्रभाव नवऱ्याच्या जीवनावर पडत असतो व नवऱ्याच्या प्रत्येक कार्याचा प्रभाव बायकोवर पडत असतो. म्हणजेच लग्नानंतर नवरा बायको एकमेकांना पूरक होतात. म्हणून त्यांना एकमेकांच्या हिताचा विचार करावा लागतो.
आज आपण येथे बायकांच्या काही गुणांबद्दल पाहणार आहोत. असे गुण व अवगुण त्यांच्या पतीवर खूपच प्रभाव पाडत असतात. काही महिलांमध्ये असे गुण असतात ज्यामुळे त्यांच्या नवऱ्याचे आयुष्य सुखी, समाधानी व ऐश्वर्यदायी बनते.
तुमच्यातही हे गुण आहेत का? असतील तर हे खूपच चांगले आहे. मात्र जर तुमच्यात हे गुण असतील तर ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. आपले व आपल्या नवऱ्याचे आयुष्य आनंदाचे व समाधानाने परिपूर्ण करा.
असे म्हटले जाते की बायका भगवंताचे प्रत्येक वेळी मनापासून ध्यान व स्मरण करतात आणि असं पाहिलं जातं की कोणत्याही धार्मिक कार्यात पुरुषांपेक्षा स्त्रिया प्रत्येक बाबींमध्ये पुढे असतात.
मनापासून जी स्त्री स्वामींचे पूजा आणि भजन, धार्मिक कार्य करते त्या बायकांचा नवरा नेहमी श्रीमंत व धनवान असतो. म्हणून ज्या स्त्रिया धार्मिक प्रवृत्तीच्या असतात त्यांच्या घरावर नेहमी भगवंतांची कृपा असते व प्रत्येक कार्यात त्यांच्या नवऱ्याला यश मिळते.
त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये कधीही कलह, वादविवाद होत नाहीत. त्यांच्या जीवनात सदैव ऐश्वर्य व सुख असते. परंतु ज्या बायका देव धर्म मानत नाही, धार्मिक कार्य करत नाहीत, देवधर्माचे काही करण्याऐवजी फक्त स्वतः नटणे, मुरडणे याच धन्यता मानतात आणि भगवंताच्या पूजना कडे लक्ष देत नाही.
त्यांच्या घरातील वातावरण नेहमीच नकारात्मक व कलहपूर्ण असते. त्याच बरोबर बायको जर स्वामींचे मनापूर्वक कार्य करत असेल तर नवऱ्याचे हे आद्य कर्तव्य आहे की त्यानेही या कार्यात हातभार लावावा. स्वामींची पूजा करावी. म्हणजे आपल्या जीवनात कधीही दारिद्र्य येणार नाही व तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ऐश्वर्याचे प्राप्ती कराल.
याच शिवाय जी बायको आपल्या पतीची व कुटुंबाची काळजी घेत घरातील सर्व कार्य मनापासून करते त्या स्त्रियांवर माता लक्ष्मी यांचा नेहमी वरदहस्त असतो आणि अशा स्त्रियांचे नवरे खूप आनंदी, समाधानी व धनवान असतात.
परंतु हीच गोष्ट पुरुषांमध्ये लागू होते. जी स्त्री पुरुषांसाठी इतके करत असेल तर नवऱ्याचा ही आपल्या बायकोची काळजी घेणे आवश्यक आहे. बायकोच्या प्रत्येक कार्यात हातभार लावण्याचा प्रयत्न करा. जर तुमच्या कामाच्या घाईगडबडीत बायकोला मदत करणे शक्य नसेल तर तिच्या कामाला प्रोत्साहन तरी द्या.
तिच्या कामाचे कौतुक जरूर करा. तुमच्या तोंडून ऐकलेल्या दोन कौतुकाचे शब्दांमुळे पत्नीचे काम करण्याचे क्षमता वेगाने वाढते व ती जास्त मनापासून घरात सर्व कामे करते. ज्या घरात स्त्रीचा मान ठेवला जातो. प्रत्येक कार्यात तिला सहभागी करून घेतले जाते. तेथे स्त्री नेहमी आनंदी व प्रसन्न असते.
आणि घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी वास्तव्य करते. परंतु ज्या घरात नवरा भांडण-तंटे, वादविवाद करत असेल. त्या घरामध्ये स्त्रिया कधीही आनंदी, संतुष्ट राहू शकत नाहीत आणि ज्या घरात गृहलक्ष्मी आनंदी नाही त्या घरात माता लक्ष्मी कधीच राहत नाही.
जर नवरा बायको एकमेकांना पूरक असतील तरच एकमेकांकडे लक्ष देणे हे खूपच आवश्यक आहे. असे म्हटले जाते की घरी आलेल्या अतिथीचा जी महिला सत्कार करते, दारात आलेल्या याचकाला रिकाम्या हस्ते परत पाठवत नाही, गोरगरिबाला मदत करते त्या स्त्रियांच्या घरी नेहमी ऐश्वर्य, समृद्धी राहते.
त्यांचे जीवन नेहमी सुखी समाधानी राहते. ज्या पुरुषांच्या पत्नी मध्ये हे तीन गुण असतात त्यांना साक्षात स्वामी भाग्यशाली समजतात.
मित्रांनो, असे म्हटले जाते की ज्या घरातील स्त्रिया भांडकुदळ असतात त्या घरात नेहमी वाद विवाद, भांडणे होत राहतात आणि अशा घरात माता लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही. म्हणून बायकांनी नेहमी शांत व संयमी राहावे.
धन्यवाद.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.