नमस्कार मित्रानो
मित्रांनो हिंदू धर्मशास्त्रानुसार अमावास्येला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक अमावस्येचे एक वेगळे महत्त्व सांगितले आहे. भाद्रपद महिन्यातील पितृपक्षात येणारी सर्वपित्री अमावस्या हि विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. या अमावास्येला महालय अमावस्या किंवा मोक्षदायिनी अमावस्या असे सुद्धा म्हटले जाते.
हा दिवस पितृपक्षाचा शेवटचा दिवस असतो म्हणून या अमावास्येला विसर्जनी अमावस्या देखील म्हटले जाते. खासकरून या अमावस्येला अशा पितरांचे तर्पण किंवा श्राद्ध केले जाते ज्यांच्या मृत्यूची तिथी माहित नसते. या अमावस्येला सर्व पिरतरांचे तर्पण किंवा श्राद्ध केले जाऊ शकते त्यामुळे या अमावस्येला सर्वपित्री अमावस्या असे म्हटले जाते.
यावर्षी येणारी सर्वपित्री अमावस्या विशेष महत्वपूर्ण मानली जात आहे कारण यावेळी अनेक वर्षानंतर अमावस्येला अतिशय शुभ संयोग जमून येत आहेत. अमावस्येच्या दिवशी सर्वार्थ सिद्धि योग बनत असून गज छाया योग सुद्धा बनत आहे.
धार्मिक दृष्टया या संयोगाला अतिशय शुभ योग मानले जाते. या संयोगावर श्राद्ध किंवा तर्पण केल्याने मनुष्याच्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होतात. सुख समृद्धी आणि आनंदाने मनुष्याचे जीवन बहरून येते. पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते.
सर्वपित्री अमावस्येला बनत असलेल्या शुभ संयोगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव या ५ राशींच्या जीवनावर पडणार असून अमावस्येपासून पुढे येणारा काळ या राशींच्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. यांच्या जीवनातील दुःख आणि दारिद्र्याचे दिवस आता संपणार आहेत.
हा काळ आपल्यासाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. आर्थिक दृष्ट्या हा काळ विशेष लाभकारी ठरणार असून अनेक आर्थिक लाभ प्राप्त होणार आहेत. यांच्या जीवनातील सर्व संकट समाप्त होणार असून यश दायक काळाची सुरवात होणार आहे.
आता आपल्या जीवनातील वाईट काळ संपणार असून सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे. आपल्या जीवनात अतिशय शुभ काळाची सुरवात होणार आहे. अमावस्येपासून पुढे येणारा काळ या ५ राशींचा भाग्योदय घडवून येण्याचे संकेत आहेत.
मेष रास
अमावस्येचा अतिशय सकारात्मक प्रभाव मेष राशीच्या जीवनावर दिसून येणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ विशेष लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार असून अनेक आर्थिक लाभ प्राप्त होणार आहेत. एखाद्या मोठ्या कर्जातून मुक्त होऊ शकता. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार असून सांसारिक सुखात वाढ होणार आहे. हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे.
कर्क रास
कर्क राशीवर अमावस्येचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. अचानक धनलाभाचे योग बनत आहेत. वैवाहिक जीवनात निर्माण झालेल्या समस्या आता दूर होणार आहेत. उद्योग व्यापार प्रगतीपथावर राहणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार असून आपल्या कार्यक्षमतेमध्ये अनेक पटीने वाढ होण्याचे संकेत आहेत.
या काळात सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे. सरकारी कामात यश प्राप्त होणार असून कोर्ट कचेऱ्यात चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागण्याचे संकेत आहेत. मानसिक ताणतणाव दूर होणार असून आपली आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे.
कन्या रास
अमावस्येपासून पुढे येणारा काळ कन्या राशीसाठी सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारी पैशांची तंगी आता दूर होण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक वाढणार आहे. आपली आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनेल.
व्यवसायाचा विस्तार घडून येण्यास सुरवात होणार आहे. या काळात मनाप्रमाणे घटना घडून येतील. मनावर असणारा मानसिक ताणतणाव आणि भयभीतीचे वातावरण आता दूर होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. सांसारिक सुखात वाढ होणार आहे.
तूळ रास
तूळ राशीवर ग्रहनक्षत्राची अनुकूलता बरसणार असून अमावस्येचा शुभ प्रभाव आपल्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. आपल्या जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. कार्यक्षेत्रातून आपल्या कमाई मध्ये वाढ दिसून येईल.
आर्थिक प्राप्तीचे अनेक मार्ग आपल्याला उपलब्ध होणार आहेत. आर्थिक प्राप्तीचे साधन प्राप्त होईल. या काळात साहस आणि पराक्रमामध्ये वाढ होणार आहे. समाजात मानसन्मानात वाढ दिसून येईल. या काळात अध्यात्मिक सुखाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात आनंदाची बहार येण्याचे संकेत आहेत.
कुंभ रास
अमावस्येपासून पुढे येणारा काळ कुंभ राशीसाठी विशेष लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. हा काळ आपल्या जीवनाला एक नवा आकार देणारा काळ ठरणार आहे. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. आपल्या मनावर असणारे भीतीचे दडपण आता दूर होणार असून आत्मविश्वासात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे संकेत आहेत.
आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे. आपल्या कार्यक्षमतेमध्ये पहिल्यापेक्षा चांगली सुधारणा दिसून येईल. आपली आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा वाढणार आहे. वैवाहिक जीवनात सुखाची प्राप्ती होणार आहे.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.